AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : समीर वानखेडेंविरोधात चैत्यभूमिवर घोषणाबाजी, मलिकांकडूनही वानखेडेंना पु्न्हा चिमटा

वानखेडे विरोधक आणि समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र विरोधकाकडे दुर्लक्ष करत, समीर वानखेडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.

Mumbai : समीर वानखेडेंविरोधात चैत्यभूमिवर घोषणाबाजी, मलिकांकडूनही वानखेडेंना पु्न्हा चिमटा
नवाब मलिक आणि समीर वानखेडे
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 06, 2021 | 10:16 PM
Share

मुंबई :  चैत्यभूमीवर समीर वानखेडेंना विरोध करण्यात आल्याचं पहायला मिळालं. तसेच वानखेडेंच्या विरोधकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली. मंत्री नवाब मलिक समीर वानखेडेंना मुस्लिम सांगून, त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात कोर्टात लढत आहेत. तर इकडे समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर विरोधाचा सामना करावा लागला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी समीर वानखेडे येताच, त्यांच्याविरोधात भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

वानखेडे समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये तणाव

वानखेडे विरोधक आणि समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र विरोधकाकडे दुर्लक्ष करत, समीर वानखेडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. विशेष म्हणजे यानंतर समीर वानखेडेंनी वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यावेळी काही वेळ वानखेडे आणि आंबेडकरांनी जवळच बसून चर्चा केली. मात्र या दोघांची नेमकी काय चर्चा झाली हे समोर येऊ शकलेलं नाही. तर चैत्यभूमीवर येऊन ऊर्जा मिळते, त्यामुळं आपण इथं आल्याचं समीर वानखेडेंनी म्हटलंय.

नवाब मलिकांकडून वानखेडेंना पुन्हा चिमटा

नवाब मलिकांनी मात्र पुन्हा एकदा समीर वानखेडेंना चिमटा काढलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारुन कोणी नमन करत असेल तर त्याचं स्वागत आहे. जय भीम म्हणजे अन्यायाच्या विरोधातला लढा आहे. जय भीम इम्पॅक्ट झाला, त्यामुळं काही लोक इथं येत आहेत. समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादन करण्यासाठी का आले नाही? हे मला माहिती नाही. पण ते माझ्यासोबत नमाज पठण करण्यासाठी नियमित यायचे, असं मलिक म्हणाले आहेत. समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिकांचा आक्षेप आहे. मुस्लिम धर्म स्वीकारला असतानाही, SCच्या जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांचा आहे. तर वानखेडे कुटुंबांनी मलिकांचे आरोप फेटाळून, लावत समीर वानखेडेंची जात महारच असल्याचं सांगत आहेत. मलिक आणि वानखेडे कुटुंबातली लढाई कोर्टात सुरु आहे..मात्र विरोधाचा सूर दादरमध्ये चैत्यभूमीवरही दिसला.

पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

St worker strike : एसटीच्या संपात उभी फूट, खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट

RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील आता ‘या’ बँकेवर बंदी, ग्राहकांना फक्त 10 हजार काढता येणार

Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ