AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील या बाप्पाला गोड गणपती का म्हणतात? कसं पडलं हे नाव? काय आहे परंपरा? जाणून घ्या A टू Z माहिती

मुंबईतील अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाचा गणपती "गोड गणपती" म्हणून प्रसिद्ध आहे. या नावामागची कहाणी एका भक्ताच्या नवसाला जोडलेली आहे. त्याने बाप्पावर साखरेचा वर्षाव केला, आणि ही परंपरा आजही चालू आहे.

| Updated on: Aug 11, 2025 | 7:49 AM
Share
मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अनेक मोठमोठ्या गणपती मंडळांचे आगमन सोहळे थाटामाटात पार पडताना दिसत आहेत. त्यातच आज मुंबईच्या गिरगावातील अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडला.

मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अनेक मोठमोठ्या गणपती मंडळांचे आगमन सोहळे थाटामाटात पार पडताना दिसत आहेत. त्यातच आज मुंबईच्या गिरगावातील अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडला.

1 / 8
अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यासाठी हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७८ मध्ये झाली. यंदा या गणेशोत्सवाचे 48 वे वर्ष आहे.

अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यासाठी हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७८ मध्ये झाली. यंदा या गणेशोत्सवाचे 48 वे वर्ष आहे.

2 / 8
अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ हे त्यांची अनोखी परंपरा आणि भव्यतेमुळे प्रसिद्ध आहे. या मंडळाची मूर्ती दरवर्षी मूर्तिकार सिद्धेश नामदेव दिघोळे यांच्याकडून तयार केली जाते. 
या मंडळाच्या गणपतीला प्रेमाने गोड गणपती म्हणून ओळखले जाते.

अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ हे त्यांची अनोखी परंपरा आणि भव्यतेमुळे प्रसिद्ध आहे. या मंडळाची मूर्ती दरवर्षी मूर्तिकार सिद्धेश नामदेव दिघोळे यांच्याकडून तयार केली जाते. या मंडळाच्या गणपतीला प्रेमाने गोड गणपती म्हणून ओळखले जाते.

3 / 8
पण या गणपतीला गोड गणपती हे नाव कसं पडलं, त्यामागचे कारण काय याबद्दल आज आपण जाणून घेऊया. अखिल चंदनवाडीच्या गणपती बाप्पाला गोड गणपती हे नाव पडण्यामागे एक खास प्रथा कारणीभूत आहे. ज्याची सुरुवात भक्तांच्या श्रद्धेतून सुरू झाली.

पण या गणपतीला गोड गणपती हे नाव कसं पडलं, त्यामागचे कारण काय याबद्दल आज आपण जाणून घेऊया. अखिल चंदनवाडीच्या गणपती बाप्पाला गोड गणपती हे नाव पडण्यामागे एक खास प्रथा कारणीभूत आहे. ज्याची सुरुवात भक्तांच्या श्रद्धेतून सुरू झाली.

4 / 8
काही वर्षांपूर्वी एका भक्ताने आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या बाप्पाकडे नवस केला होता. त्याचा तो नवस पूर्ण झाल्यावर त्याने गणपती बाप्पाला साखर अर्पण करण्याचे वचन दिले होते. त्या भक्ताचा नवस पूर्ण झाला. त्यानंतर त्याने नवस बोलल्याप्रमाणे बाप्पावर साखरेचा वर्षाव केला.

काही वर्षांपूर्वी एका भक्ताने आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या बाप्पाकडे नवस केला होता. त्याचा तो नवस पूर्ण झाल्यावर त्याने गणपती बाप्पाला साखर अर्पण करण्याचे वचन दिले होते. त्या भक्ताचा नवस पूर्ण झाला. त्यानंतर त्याने नवस बोलल्याप्रमाणे बाप्पावर साखरेचा वर्षाव केला.

5 / 8
ही घटना पाहून इतर भाविकांनीही याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर मग ही प्रथा हळूहळू लोकप्रिय झाली. याच परंपरेमुळे या गणपतीला गोड गणपती असे नाव पडले आहे.
साखरेचा वर्षाव करण्याच्या प्रथेवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.

ही घटना पाहून इतर भाविकांनीही याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर मग ही प्रथा हळूहळू लोकप्रिय झाली. याच परंपरेमुळे या गणपतीला गोड गणपती असे नाव पडले आहे. साखरेचा वर्षाव करण्याच्या प्रथेवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.

6 / 8
पण मंडळाने यावर एक छान उपाय शोधून काढला. जे भक्त गणपती बाप्पाच्या चरणी साखर अर्पण करतात, तेव्हा ती सर्व साखर उधळली जात नाही. त्यातील थोडी साखर ही गुलालात मिक्स केली जाते. यानंतर विसर्जनावेळी बाप्पावर त्याचा वर्षाव केला जातो.

पण मंडळाने यावर एक छान उपाय शोधून काढला. जे भक्त गणपती बाप्पाच्या चरणी साखर अर्पण करतात, तेव्हा ती सर्व साखर उधळली जात नाही. त्यातील थोडी साखर ही गुलालात मिक्स केली जाते. यानंतर विसर्जनावेळी बाप्पावर त्याचा वर्षाव केला जातो.

7 / 8
यानंतर बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली साखर दुसऱ्या दिवशी नारळासोबत चंदनावाडीतील रहिवाशांना प्रसाद म्हणून वाटली जाते. यामुळे, भक्तांच्या श्रद्धेचा आदर राखला जातो आणि साखरेचा सदुपयोगही होतो. ही परंपरा प्रसिद्धीसाठी नसून, केवळ भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.

यानंतर बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली साखर दुसऱ्या दिवशी नारळासोबत चंदनावाडीतील रहिवाशांना प्रसाद म्हणून वाटली जाते. यामुळे, भक्तांच्या श्रद्धेचा आदर राखला जातो आणि साखरेचा सदुपयोगही होतो. ही परंपरा प्रसिद्धीसाठी नसून, केवळ भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.

8 / 8
Follow Us
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....