AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, अखेर ते मालिकेत घडणार आहे. यासाठी एका लोकप्रिय जोडप्याचीही खास एण्ट्री होणार आहे.

| Updated on: Feb 27, 2025 | 1:48 PM
Share
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे.

1 / 8
ढोल ताश्यांच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी-ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत. प्रेक्षकांना लवकरच मालिकेत हे कथानक पहायला मिळणार आहे.

ढोल ताश्यांच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी-ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत. प्रेक्षकांना लवकरच मालिकेत हे कथानक पहायला मिळणार आहे.

2 / 8
हा खास क्षण आणखी खास करण्यासाठी आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सारिका नवाथे, अदिती देशपांडे आणि गिरीजा प्रभू यांनी हजेरी लावली आहे.

हा खास क्षण आणखी खास करण्यासाठी आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सारिका नवाथे, अदिती देशपांडे आणि गिरीजा प्रभू यांनी हजेरी लावली आहे.

3 / 8
अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केलाय. तर अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणजेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीने ढोल वाजवून जानकी-ऋषिकेशचं स्वागत केलं आहे.

अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केलाय. तर अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणजेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीने ढोल वाजवून जानकी-ऋषिकेशचं स्वागत केलं आहे.

4 / 8
जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. दोघंही या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत. अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. दोघंही या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत. अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

5 / 8
अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी देखिल हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या रुपात त्यांची एण्ट्री होत आहे.

अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी देखिल हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या रुपात त्यांची एण्ट्री होत आहे.

6 / 8
याचसोबत 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा निर्माता म्हणून त्यांचं या मालिकेशी जिव्हाळ्याचं नातं आहे.

याचसोबत 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा निर्माता म्हणून त्यांचं या मालिकेशी जिव्हाळ्याचं नातं आहे.

7 / 8
खूप वर्षांनंतर मालिकेत भूमिका साकारल्याचा वेगळा आनंद होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जानकी-ऋषिकेशच्या आयुष्यातला हा नवा अध्याय प्रेक्षकांना 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळेल.

खूप वर्षांनंतर मालिकेत भूमिका साकारल्याचा वेगळा आनंद होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जानकी-ऋषिकेशच्या आयुष्यातला हा नवा अध्याय प्रेक्षकांना 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळेल.

8 / 8
Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक