
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 26 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीत झिंबाब्वेवर विजय मिळवला. भारताचा सुपर 8 मधील हा पहिला विजय ठरला. भारताने यासह सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवलं. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने मोठी कामगिरी केली. अर्शदीपने जसप्रीत बुमराह याला मागे टाकत खास विक्रम आपल्या नावावर केला. (Photo Credit : PTI)

अर्शदीप सिंह याने झिंबाब्वेच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 24 धावांच्या मोबदल्यात या 3 विकेट्स मिळवल्या. अर्शदीप यासह जसप्रीत बुमराह याला मागे टाकत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स मिळवणारा गोलंदाज ठरला. (Photo Credit : PTI)

जसप्रीत बुमराह याने भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 33 विकेट्स मिळवल्या आहेत. तर अर्शदीप सिंह याने 19 सामन्यांमध्ये 14.25 च्या सरासरीने 35 विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे. (Photo Credit : PTI)

अर्शदीपने झिंबाब्वेच्या कर्णधारासह इतर 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीपने झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा, रयान बर्ल आणि टोनी मु्न्योंगा या तिघांना आऊट केलं. (Photo Credit : PTI)

तसेच अर्शदीप टी 20i वर्ल्ड कपसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये (T20I) भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. अर्शदीपने आतापर्यंत 81 सामन्यांमध्ये 126 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)