IPL 2026 Final: आयपीएल 2026 स्पर्धेच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून विराट कोहली आऊट, झालं असं की…
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात ऑरेंज कॅप कोण मिळवू शकतं? याची उत्सुकता आहे. पण या शर्यतीतून विराट कोहली मात्र आऊट झाला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून विराट कोहली आऊट झाला आहे. विराट कोहलीने यंदाच्या पर्वात 600 धावांचा पल्ला गाठला आहे. मात्र अंतिम फेरीत ऑरेंज कॅप मिळवणं कठीण आहे. कारण विराट कोहली 176 धावांनी मागे आहे. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहली आयपीएलच्या 15 डावात खेळला आणि 365 चेंडूत त्याने 600 धावा केल्या. इतकी चांगली कामगिरी करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून आऊट झाला आहे. कारण अंतिम फेरीत 176 धावा करणं काही जमणार नाही. त्यामुळे आरसीबीचे फलंदाज आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून बाद झाला. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहलीचं ऑरेंज कॅपचं नुकसान दोन सामन्यात झालं. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला खातं खोलता आलं नव्हतं. त्यामुळे या शर्यतीतून मागे पडला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे. त्याच्या नावावर 776 धावा आहेत. (Photo: IPL/BCCI)

शुबमन गिल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 441 चेंडूत 722 धावा आहेत. त्याने एक शतक आणि सहा अर्धशतकं ठोकली आहेत. त्याला ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी 55 धावांची गरज आहे. त्याने ही कामगिरी अंतिम फेरीत केली तर त्याला ऑरेंज कॅप मिळेल. (Photo: IPL/BCCI)

गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यान 16 डावात 445 चेंडूत 710 धावा केल्या आहेत. त्याला 67 धावांची गरज आहे. आता शुबमन गिल आणि साई सुदर्शन यापैकी कोण ऑरेंज कॅप मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo: IPL/BCCI)