AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर तो क्षण आलाच, ‘ठरलं तर मग’मधील विलास मर्डर केसचा निकाल जाहीर; बंद होणार मालिका?

'ठरलं तर मग' ही मालिका रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली हे मुख्य भूमिकेत आहेत. दमदार कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी असते.

| Updated on: Aug 01, 2025 | 10:35 AM
Share
गेल्या एक महिन्यापासून ज्या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. विलास मर्डर केसमध्ये साक्षी आणि तन्वी दोषी ठरल्या असून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. अखेर दोन वर्षांनंतर मधुभाऊंना न्याय मिळाला आहे.

गेल्या एक महिन्यापासून ज्या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. विलास मर्डर केसमध्ये साक्षी आणि तन्वी दोषी ठरल्या असून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. अखेर दोन वर्षांनंतर मधुभाऊंना न्याय मिळाला आहे.

1 / 7
मालिकेतला हा महत्त्वाचा टप्पा साकारण्यासाठी 'ठरलं तर मग'च्या संपूर्ण टीमने कंबर कसली आहे. जवळपास महिन्याभरापासून या खास भागाची तयारी सुरु होती. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी या भागासाठी विशेष मेहनत घेत होते.

मालिकेतला हा महत्त्वाचा टप्पा साकारण्यासाठी 'ठरलं तर मग'च्या संपूर्ण टीमने कंबर कसली आहे. जवळपास महिन्याभरापासून या खास भागाची तयारी सुरु होती. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी या भागासाठी विशेष मेहनत घेत होते.

2 / 7
कोर्टाचे सीन साकारण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शनही घेतलं गेलं. कोर्टाचं कामकाज नेमकं कसं चालतं, याची संपूर्ण माहिती आणि अभ्यास करुनच सीन लिहिले जात होते. मालिकेतले बरेचसे सीन कोर्टाचे असल्यामुळे अभिनेता अमित भानुशाली प्रचंड मेहनत घेत होता.

कोर्टाचे सीन साकारण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शनही घेतलं गेलं. कोर्टाचं कामकाज नेमकं कसं चालतं, याची संपूर्ण माहिती आणि अभ्यास करुनच सीन लिहिले जात होते. मालिकेतले बरेचसे सीन कोर्टाचे असल्यामुळे अभिनेता अमित भानुशाली प्रचंड मेहनत घेत होता.

3 / 7
या अनुभवाविषयी सांगताना अमित म्हणाला, "मालिकेचं शूटिंग करताना प्रत्येक दिवस ही नवी परीक्षा असते. 'ठरलं तर मग'च्या या महत्त्वाच्या सीनसाठी संपूर्ण टीमने कंबर कसली होती."

या अनुभवाविषयी सांगताना अमित म्हणाला, "मालिकेचं शूटिंग करताना प्रत्येक दिवस ही नवी परीक्षा असते. 'ठरलं तर मग'च्या या महत्त्वाच्या सीनसाठी संपूर्ण टीमने कंबर कसली होती."

4 / 7
"कोर्टातला शेवटचा सीन 50 पानांचा होता. त्यात सगळ्यात जास्त संवाद माझे होते. या सीनचं स्क्रीप्ट जेव्हा माझ्या हाती पडलं तेव्हा थोडी धाकधूक होती. मात्र मी प्रचंड मेहनत घेतली आणि हा सीन पूर्ण केला. अभिनेता म्हणून हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही," असं  त्याने सांगितलं.

"कोर्टातला शेवटचा सीन 50 पानांचा होता. त्यात सगळ्यात जास्त संवाद माझे होते. या सीनचं स्क्रीप्ट जेव्हा माझ्या हाती पडलं तेव्हा थोडी धाकधूक होती. मात्र मी प्रचंड मेहनत घेतली आणि हा सीन पूर्ण केला. अभिनेता म्हणून हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही," असं त्याने सांगितलं.

5 / 7
केसचा निकाल लागल्यानंतर 'ठरलं तर मग' ही मालिका संपणार का अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगतेय. या प्रश्नाचंही उत्तर अमितने दिलं आहे.

केसचा निकाल लागल्यानंतर 'ठरलं तर मग' ही मालिका संपणार का अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगतेय. या प्रश्नाचंही उत्तर अमितने दिलं आहे.

6 / 7
"मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मालिकेचा शेवट होत नाहीये. याउलट कथानक अतिशय रंजक वळण घेणार आहे. अजून बरेचसे खुलासे बाकी आहेत," असं अमितने स्पष्ट केलंय.

"मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मालिकेचा शेवट होत नाहीये. याउलट कथानक अतिशय रंजक वळण घेणार आहे. अजून बरेचसे खुलासे बाकी आहेत," असं अमितने स्पष्ट केलंय.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.