AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर तो क्षण आलाच, ‘ठरलं तर मग’मधील विलास मर्डर केसचा निकाल जाहीर; बंद होणार मालिका?

'ठरलं तर मग' ही मालिका रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली हे मुख्य भूमिकेत आहेत. दमदार कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी असते.

| Updated on: Aug 01, 2025 | 10:35 AM
Share
गेल्या एक महिन्यापासून ज्या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. विलास मर्डर केसमध्ये साक्षी आणि तन्वी दोषी ठरल्या असून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. अखेर दोन वर्षांनंतर मधुभाऊंना न्याय मिळाला आहे.

गेल्या एक महिन्यापासून ज्या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. विलास मर्डर केसमध्ये साक्षी आणि तन्वी दोषी ठरल्या असून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. अखेर दोन वर्षांनंतर मधुभाऊंना न्याय मिळाला आहे.

1 / 7
मालिकेतला हा महत्त्वाचा टप्पा साकारण्यासाठी 'ठरलं तर मग'च्या संपूर्ण टीमने कंबर कसली आहे. जवळपास महिन्याभरापासून या खास भागाची तयारी सुरु होती. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी या भागासाठी विशेष मेहनत घेत होते.

मालिकेतला हा महत्त्वाचा टप्पा साकारण्यासाठी 'ठरलं तर मग'च्या संपूर्ण टीमने कंबर कसली आहे. जवळपास महिन्याभरापासून या खास भागाची तयारी सुरु होती. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी या भागासाठी विशेष मेहनत घेत होते.

2 / 7
कोर्टाचे सीन साकारण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शनही घेतलं गेलं. कोर्टाचं कामकाज नेमकं कसं चालतं, याची संपूर्ण माहिती आणि अभ्यास करुनच सीन लिहिले जात होते. मालिकेतले बरेचसे सीन कोर्टाचे असल्यामुळे अभिनेता अमित भानुशाली प्रचंड मेहनत घेत होता.

कोर्टाचे सीन साकारण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शनही घेतलं गेलं. कोर्टाचं कामकाज नेमकं कसं चालतं, याची संपूर्ण माहिती आणि अभ्यास करुनच सीन लिहिले जात होते. मालिकेतले बरेचसे सीन कोर्टाचे असल्यामुळे अभिनेता अमित भानुशाली प्रचंड मेहनत घेत होता.

3 / 7
या अनुभवाविषयी सांगताना अमित म्हणाला, "मालिकेचं शूटिंग करताना प्रत्येक दिवस ही नवी परीक्षा असते. 'ठरलं तर मग'च्या या महत्त्वाच्या सीनसाठी संपूर्ण टीमने कंबर कसली होती."

या अनुभवाविषयी सांगताना अमित म्हणाला, "मालिकेचं शूटिंग करताना प्रत्येक दिवस ही नवी परीक्षा असते. 'ठरलं तर मग'च्या या महत्त्वाच्या सीनसाठी संपूर्ण टीमने कंबर कसली होती."

4 / 7
"कोर्टातला शेवटचा सीन 50 पानांचा होता. त्यात सगळ्यात जास्त संवाद माझे होते. या सीनचं स्क्रीप्ट जेव्हा माझ्या हाती पडलं तेव्हा थोडी धाकधूक होती. मात्र मी प्रचंड मेहनत घेतली आणि हा सीन पूर्ण केला. अभिनेता म्हणून हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही," असं  त्याने सांगितलं.

"कोर्टातला शेवटचा सीन 50 पानांचा होता. त्यात सगळ्यात जास्त संवाद माझे होते. या सीनचं स्क्रीप्ट जेव्हा माझ्या हाती पडलं तेव्हा थोडी धाकधूक होती. मात्र मी प्रचंड मेहनत घेतली आणि हा सीन पूर्ण केला. अभिनेता म्हणून हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही," असं त्याने सांगितलं.

5 / 7
केसचा निकाल लागल्यानंतर 'ठरलं तर मग' ही मालिका संपणार का अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगतेय. या प्रश्नाचंही उत्तर अमितने दिलं आहे.

केसचा निकाल लागल्यानंतर 'ठरलं तर मग' ही मालिका संपणार का अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगतेय. या प्रश्नाचंही उत्तर अमितने दिलं आहे.

6 / 7
"मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मालिकेचा शेवट होत नाहीये. याउलट कथानक अतिशय रंजक वळण घेणार आहे. अजून बरेचसे खुलासे बाकी आहेत," असं अमितने स्पष्ट केलंय.

"मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मालिकेचा शेवट होत नाहीये. याउलट कथानक अतिशय रंजक वळण घेणार आहे. अजून बरेचसे खुलासे बाकी आहेत," असं अमितने स्पष्ट केलंय.

7 / 7
Follow Us
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.