AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलंगणात काँग्रेसला खिंडार, 18 पैकी 12 आमदारांनी पक्ष सोडला

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला जबरदस्त धक्का लागण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी  विधानसभेच्या अध्यक्ष पोचराम श्रीनिवास यांची भेट घेतली आहे. “आम्हाला तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस)मध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी,” अशी मागणी या 12 आमदारांनी केली आहे. तेलंगणामध्ये डिसेंबर 2018 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी तेलंगणातील 119 जागांपैकी […]

तेलंगणात काँग्रेसला खिंडार, 18 पैकी 12 आमदारांनी पक्ष सोडला
| Updated on: Jun 06, 2019 | 6:43 PM
Share

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला जबरदस्त धक्का लागण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी  विधानसभेच्या अध्यक्ष पोचराम श्रीनिवास यांची भेट घेतली आहे. “आम्हाला तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस)मध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी,” अशी मागणी या 12 आमदारांनी केली आहे.

तेलंगणामध्ये डिसेंबर 2018 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी तेलंगणातील 119 जागांपैकी 88 जागांवर टीआरएसचे आमदार निवडून आले  होते. त्या तुलनेत काँग्रेसला केवळ 19 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे विधानपरिषदेत काँग्रेसचे केवळ 19 आमदार होते. मात्र लोकसभा निवडणुकीत तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एन.उत्तम कुमार रेड्डी यांनी नालगोंडाच्या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला होता. तेलंगणातून हुजूरनगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.

या कारणामुळे काँग्रेसचे तेलंगणात फक्त 18 आमदार शिल्लक राहिले होते. मात्र या आमदारांपैकी 12 आमदारांनी आम्हाला टीआरएसमध्ये सहभागी व्हायचं असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यानुसार आज (6 जून) या 12 आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आम्हाला टीआरएसमध्ये पक्षामध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी या 12 आमदारांनी केली आहे.

दरम्यान काँग्रेसच्या आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केल्यास, त्यांचे विधानपरिषदेत केवळ 6 आमदार उरतील. तसेच तेलंगणामध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.