AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवर अब्दुल सत्तार यांचं प्रथमच स्पष्टीकरण, विधानसभेत काय म्हणाले?

या मुद्द्यावर कोर्ट जो निर्णय देईल, तो मान्य असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.

जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवर अब्दुल सत्तार यांचं प्रथमच स्पष्टीकरण, विधानसभेत काय म्हणाले?
Image Credit source: विधानसभा
| Updated on: Dec 28, 2022 | 1:30 PM
Share

नागपूरः एक-दोन नाही तर तीन प्रकरणांत कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांना सत्तार काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापैकी वाशिम (washim) येथील गायरान जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करून देण्याचा महत्त्वाचा आरोप आहे. सत्तार यांनी आज विधानसभेत यावर स्पष्टीकरण दिलं. तर टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा वापर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलींना नोकरी लावण्यासाठी करून घेतल्याचा आरोप आहे. या आरोपावरही फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्टीकरण दिलं.

गायरान जमीनीच्या आरोपांना सत्तार यांचं उत्तर-

वाशिम येथील जमिनीचं हे प्रकरण आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गायरान जमीन प्रकरणी निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करत सत्तार यांनी दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर जमीन नियमित करून दिल्याचा हा आरोप आहे. विधानसभेत बोलताना, शासन निर्णयानुसार, काही जमिनी भूमीहीन शेतकरी, अनुसूचित जाती जमाती या व्यक्तींना प्रदान करणे अनुज्ञेय आहे. शासनाच्या निर्णयानुसार अशा व्यक्तींची अतिक्रमणं नियमित करण्याचे निर्णय यापूर्वी अनेकवेळा घेण्यात आले आहेत.

त्यात शाळा, दवाखाने, सार्वजनिक बांधकामे यासाठी हे नियम शिथिल करण्यात येतात. या प्रकरणातील मागासवर्यीय, आदिवासी समाजाचे प्रमुख लोक होते, त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मला जे आरोप केलेत, त्यानुसार हायकोर्टाने मला जी शिक्षा देईल, ती मान्य आहे.

या आदेशामुळे कोणताही फायदा किंवा नुकसान झालेलं नाही. महसूल मंत्री यांच्यासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर कोर्ट जो निर्णय देईल, तो मान्य असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.

तर टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलीच लाभार्थी असल्याचा आरोप आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. सत्तार यांच्या मुली या पात्रता परीक्षेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत त्यांना नोकरी लागलेली नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...