AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abdul Sattar : टीईटी घोटाळ्याचे आरोप असतानाही कसं मिळालं मंत्रिपद? मंत्री अब्दुल सत्तारांनी सर्व उलगडून सांगितलं

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जवळच्या लोकांवरती टीईटी घोटाळ्यात हात असल्याचा आरोप असताना आणि हे प्रकरण तपासत असताना अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाल्यानेही विरोधकांकडून सडकून टीका होती. मात्र या टीकेला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलंय.

Abdul Sattar : टीईटी घोटाळ्याचे आरोप असतानाही कसं मिळालं मंत्रिपद? मंत्री अब्दुल सत्तारांनी सर्व उलगडून सांगितलं
अब्दुल सत्तारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2022 | 7:49 PM
Share

मुंबई : गेला सव्वा महिन्यापासून राज्याला ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) प्रतीक्षा लागली होती. तो मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडलाय. एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि भाजपकडून (BJP) तब्बल 18 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आलीय. यात पहिला मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे महिलांचा मंत्रिमंडळात समावेश नसल्याचा आणि दुसऱ्या एका मुद्द्यावरून टीका होऊ लागली ती म्हणजे आरोप असणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्री संजय राठोड यांना आरोपामुळे गेल्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं होतं. त्यांना या मंत्रिमंडळात सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. यावरून आरोप होत असतानाच मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जवळच्या लोकांवरती टीईटी घोटाळ्यात हात असल्याचा आरोप असताना आणि हे प्रकरण तपासत असताना अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाल्यानेही विरोधकांकडून सडकून टीका होती. मात्र या टीकेला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलंय.

माझा कोणताही संबंध नाही

मी डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांच्या माहितीचं पत्र दिलं, शिक्षण विभागाचे पत्र दिलं. हे सर्व असल्यानंतर आरोपांमध्ये कोणतेही सत्यता उरत नाही. हे आरोपांमध्ये सत्यता असती तर आम्हाला अडचण आली अस.ती सध्या या प्रकरणी ईडी तपास करत आहे. आमच्या परिवाराने त्याचा उपयोग करून घेतला असेल आणि जर आमच्याकडे कागद असतील तर त्याची चौकशी करायला हवी. त्यासाठी मीच मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली, अशी माहिती सत्तार यांनी दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने सांगितले की पगार बंद करता येणार नाहीत. पण आमच्या लोकांचे पगार बंद झाले आहेत. मात्र या प्रकरणात आमचा कसलाही संबंध नाही, ज्यांनी हे खेळ केला आहे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनीच केलीय.

लवकरच इतर मंत्र्यांनाही संधी मिळेल

तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. कोणताही मंत्री किंवा आमदार सध्या नाराज नाही, हा अंतिम मंत्रिमंडळ विस्तार नाही. 23 ते 24 मंत्र्यांचा आणखी विस्तार होणार आहे. त्यात अनेकांना संधी मिळेल. आजचा जो विस्तार झाला आहे तो मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन केलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांनाही संधी मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.