AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फडणवीस यांनी आम्हाला का टाळलं ते माहीत नाही’, मोठ्या दलित नेत्याच्या मनातील खंत

"बाहेर पडायचं म्हणजे जायचं कुठे हा प्रश्न आहे?. महाराष्ट्रात आमच्यावर अन्याय होतो ही गोष्ट खरी आहे. मी पुन्हा एकदा फडणवीस यांची भेट घेणार आणि चर्चा करणार" असं या नेत्याने सांगितलं.

'फडणवीस यांनी आम्हाला का टाळलं ते माहीत नाही', मोठ्या दलित नेत्याच्या मनातील खंत
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Dec 16, 2024 | 5:39 PM
Share

“मी फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाची मागणी केली होती. एक MLC, एक मंत्रिपद आणि काही महामंडळ अशी मी फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. महायुतीला मिळालेल्या यशात आमच्या पक्षाचा मोठा वाटा आहे. फडणवीस यांनी आम्हाला का टाळलं ते माहीत नाही. आम्ही त्यांची भेट घेऊन बाकी असलेल्या खात्याची मागणी करणार. आम्ही तुम्हाला प्रामाणिक मत देतो, मग मंत्रीपद देत नाहीत. देशात माझ्या पक्षाचे आमदार, कार्यकर्ते आहेत. माझी नाराजी आहे, आमचा फडणवीस यांनी विचार करावा” अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मनातल्या भावना बोलून दाखवल्या.

“आम्हाला मंत्रिपद मिळत नसेल, तर आता राहिलेल्या MLC मधे संधी द्यावी, महामंडळात आम्हाला संधी द्यावी. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार पुढं मंत्रिपदासाठी आमचा विचार व्हावा. आमचे कार्यकर्ते काही मोठे उद्योजक, दोन नंबर धंदे करणारे नाहीत. त्यामुळं आम्हाला काही ED आणि बिडीची भीती नाही” असं रामदास आठवले म्हणाले. छगन भुजबळांच्या नाराजीवर सुद्धा रामदास आठवले बोलले. “अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा विचार करायला हवा होता. ते पुढे विचार करतील असं वाटतं” असं रामदास आठवले म्हणाले.

‘ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशाच्या बाहेर जावं’

“परभणीत संविधाच पुस्तकं ठेवलं होतं, त्याचा अपमान एका व्यक्तीने केला होता, त्या व्यक्तीला पकडलं आहे. परभणीत सोमनाथ सुर्यवंशी नावाच्या व्यक्तीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. झालेली घटना दुर्देवी आहे. संविधान हे देशाचं संविधान आहे. ज्यांना संविधान मान्य आहे, त्यांनाच देशात राहण्याचा अधिकार, ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशाच्या बाहेर जावं ही आमची भूमिका आहे” असं रामदास आठवले म्हणाले.

‘मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, त्यात त्यांचा मृत्यू’

“परभणीत जातीय दंगल व्हावी अशी भूमिका नव्हती. मी देखील परभणीला भेट दिली, जिल्हाधिकारी आणि SP यांच्याशी माझी चर्चा झाली. सोमनाथ सुर्यवंशी यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांमुळे झाला, त्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावं” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा