AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोले म्हणाले, आम्ही स्वबळाचा शब्द दिलाय, आता दिल्लीतील काँग्रेस नेत्याची मोठी घोषणा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, ते महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (Congress Maharashtra in charge H K Patil) यांनी मोठं विधान केलं आहे.

नाना पटोले म्हणाले, आम्ही स्वबळाचा शब्द दिलाय, आता दिल्लीतील काँग्रेस नेत्याची मोठी घोषणा
Congress H K Patil Rahul Gandhi
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 3:39 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, ते महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील नियोजित दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीत दाखल झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, पटोलेंनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (Congress Maharashtra in charge H K Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. “आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वबळावर तयारी सुरु केली आहे, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय हा पार्लमेंटरी कमिटीत घेऊ”, असं पाटील म्हणाले. (After Nana Patole Congress Maharashtra in charge H K Patil said we will contest local body election on own )

एच. के. पाटील म्हणाले, “नाना पटोले हे संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्रातील सरकार धोक्यात नाही. सरकार चांगले काम करत आहे. कॉंग्रेसचे समर्थन कायम राहिल आणि सरकार पाच वर्ष टिकणार”

तीन पक्ष एकत्र, ऑपरेशन लोटस चालणार नाही

हिडन ऑपरेशन लोटसबद्दल मला माहिती नाही, मात्र आम्ही तीन पक्ष सोबत आहोत, त्यामुळे हे हिडन लोटस ऑपरेशन महाराष्ट्रात चालणार नाही, असं एच के पाटील यांनी नमूद केलं.

नाना पटोले तातडीने दिल्लीत 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून काल 24 तारखेला दिल्लीला रवाना झाले. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.  आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर (Congress) लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव येथे स्वबळाचा पुनरुच्चार केला होता.

संबंधित बातम्या   

काँग्रेस स्वबळावरच लढणार, आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही, नाना पटोलेंचा निर्धार

आधी स्वबळाची भाषा, आता दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना     

काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?, काँग्रेस नेत्याचा सवाल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.