AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमधील एकूण एक पदाधिकाऱ्याचा राजीनामा

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नांदेडमधील काँग्रस जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

नांदेडमधील एकूण एक पदाधिकाऱ्याचा राजीनामा
| Updated on: Jun 07, 2019 | 4:24 PM
Share

नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नांदेडमधील काँग्रस जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच आपले राजीनामे स्वीकारुन तात्काळ नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली.

अशोक चव्हाण यांचा पराभव स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी अशाप्रकारे सामुहिक निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा दिल्याचे सांगितले होते. तसेच आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. राहुल गांधी यांनीही लोकसभा निकालानंतर काँग्रेस कार्यकारीणीकडे आपला राजीनामा सोपवला होता. मात्र, पक्षाने त्यांचा राजीनामा नाकारला. त्यानंतर राहुल गांधींनी पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत दिले होते.

अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्त्वात राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात 2014 साली नांदेड आणि हिंगोली येथील 2 जागा विजयी झाल्या होत्या. यावर्षी काँग्रेसला याही जागा राखता आल्या नाहीत. केवळ चंद्रपुरात शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला. अशोक चव्हाण यांनाही स्वत:ची नांदेडची जागा राखता आली नाही. हिंगोलीतून राजीव सातव लढले नाहीत, मात्र सुभाष वानखेडे यांनाही हिंगोलीची जागा काँग्रेसकडे आणता आली नाही.

अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत काँग्रेसने राज्यात चांगली कामगिरी केल्याचे उदाहरण नाही. त्यात लोकसभा निवडणुकीत तर राज्यात काँग्रेसने 48 पैकी केवळ एक जागा जिंकत लाजीरवाणी कामगिरी केली. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.

Follow Us
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.