AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर रस्त्यावर उतरणार, सत्तार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवे आक्रमक

शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरू असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. 

...तर रस्त्यावर उतरणार, सत्तार यांच्या 'त्या' वक्तव्यावर दानवे आक्रमक
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 23, 2022 | 11:16 AM
Share

औरंगाबाद :  राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. बळीराजा हवालदिल आहे. शेतकरी नुकसानभरपाईकडे डोळे लावून बसला आहेत. मात्र दुसरीकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे. यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरू असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadanas Danve) यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे?

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यंदा राज्यात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली.  याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सध्या शेतात गुडगाभर पाणी आहे, आताचे पीक तर हातचे गेले मात्र पुढचे पीक देखील शेतकऱ्यांना घेता येते की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी दानवे यांनी केली आहे.  शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी दानवे यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर

दरम्यान आज उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत . ते अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत.  यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.