भाजपच्या नवनियुक्त खासदारंशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना मला या निकालानंतर धक्का बसलेला नाही, असं म्हटलं आहे. यावर अनिल बोंडे ‘जोरका धक्का धिरेसे लगा’ असं म्हटलं आहे. तितकाच जोराचा धक्का लागल्यावर तुम्ही पवार साहेबांना विचाराल काही लागलं का तर ते असंच म्हणणार. महाराष्ट्राच्या राजकारणात माणसं मोठी करणारा, परिपक्व असलेला, माणसं जवळ करणारा फक्त एकच माणूस आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. मुंबई पासून गजचिरोली पर्यंत एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेद्रं फडणवीस आहे. देवेंद्रजी नी आधीच सांगितलं आहे कोणी मुहूर्त सांगू नये आपापसातल्या कलाने हे सरकार पडेल.