AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते तर बावन’खुळे’, फार खळखळाट करू नका; अरविंद सावंत यांनी डिवचले

दोन्ही नवरा बायकोचे जात प्रमाणपत्र बोगस निघाले. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झालं होतं, खोटी कागदपत्र त्यांनी सादर केली होती. त्यामुळे लोकांना कळतंय खोट्याच्या मागे गोटा उभा आहे.

ते तर बावन'खुळे', फार खळखळाट करू नका; अरविंद सावंत यांनी डिवचले
ते तर बावन'खुळे', फार खळखळाट करू नका; अरविंद सावंत यांनी डिवचलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2022 | 3:45 PM
Share

मुंबई: मशालला पंजाने हातात पकडलं आहे. पंजाच्या हातात घडी आहे. त्यामुळे ही मशाल कुणाच्या विचारावर चालते हे सांगायची गरज नाही. पण ही मशाल आपल्याला विझवायची आहे. वरळीच्या समुद्राचंच पाणी आणून ही मशाल विझवायची आहे, असं वक्तव्य भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केलं होतं. बावनकुळे यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते, खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी समाचार घेतला आहे. मशालीवर टीका करणारे हे बावनखुळे आहेत. त्यांचा खुळखुळाट आणि खळखळाट फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला आहे.

अरविंद सावंत हे मीडियाशी संवाद साधत होते. उभ्या महाराष्ट्रात विचारांची मशाल पेटली आहे, आचारांची पेटली आहे. राजकीयदृष्ट्या मशाल पेटवणं ठिक आहे. पण ती मनात आहे. त्यामुळे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शस्र हातात घेतील ते मराठी माणसाच्या हातातील शस्त्र आहे. मशाल मनात रुजवली गेली आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

कोणीतरी म्हणालं अरबी समुद्राचं आणू आणि मशाल विझवू. ते सुळे आहेत की खुळे आहेत मला माहिती नाही. असे हे बावन’खुळे’ त्यांनी खुळखुळाट करू नये आणि खळखळाट पण करु नका. मशाल अशी विझत नाही रे. अग्नीवर पाणी टाकाल, मनातल्या मशालीवर पाणी कसं टाकाल? असा सवाल त्यांनी केला.

यावेळी त्यांनी मनसेवरही टीका केली. ज्यांना जात प्रांत आठवायला लागलाय, ते मराठी माणसांबद्दल बोलतात, अशी टीका त्यांनी मनसेचं नाव न घेता केली. तसेच मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरही शंका उपस्थित केली. दोन्ही नवरा बायकोचे जात प्रमाणपत्र बोगस निघाले. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झालं होतं, खोटी कागदपत्र त्यांनी सादर केली होती. त्यामुळे लोकांना कळतंय खोट्याच्या मागे गोटा उभा आहे, अशी टीका त्यांनी केली.

निवडणुकीच्या तोंडावर यांना मराठी आठवतेय. उद्योग बाहेर जाताना नाही आठवला मराठी माणूस?, असा सवाल त्यांनी केला. उपासमारीत आपला देश 107व्या क्रमांकावर आहोत. काय विश्वगुरु आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तिकडे यांचं लक्ष नाही, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.