AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिष शेलार ‘या’ निवडणुकीतून माघार घेणार? काय घडतंय मुंबईत?

विशेष म्हणजे मुंबईतल्या महत्त्वाच्या या निवडणुकीत पवार आणि शेलार यांच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे सेना या सर्वच पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आशिष शेलार 'या' निवडणुकीतून माघार घेणार? काय घडतंय मुंबईत?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 12, 2022 | 10:55 AM
Share

मुंबईः मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) कार्यकारिणीच्या निवडणुकीची सध्या मुंबईत चर्चा आहे. यंदा पहिल्यांदाच आशिष शेलार (Ashish Shelar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात युती झाली आहे. आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्जही भरला आहे. शेलारांचा सामना माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्याशी होणार अशी स्थिती आहे. मात्र शेलार या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशीष शेलार भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) चे खजिनदार होणार असल्याने त्यांना MCA निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे, असे म्हटले जात आहे.

लोढा समिती तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एका व्यक्तीला एकाचवेळी BCCI आणि स्थानिक संघटनेत वरिष्ठ पदावर राहता येत नाही. त्यामुळे आशीष शेलार हे MCA निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.

18 ऑक्टोबर रोजी BCCI कार्यकारिणीची निवडणूक आहे. तर 14 ऑक्टोबरपर्यंत MCA निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत आहे.

शरद पवार-आशीष शेलार गटातील अमोल काळे आणि संजय नाईक यांनीही अध्यक्ष पदासाठी अर्ज भरले आहेत.

दरम्यान, माजी क्रिकेकपटू संदीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरही आक्षेप घेण्यात आला होता. कॉन्फलिक्ट ऑफ इंट्रेस्ट नियमानुसार हा आक्षेप घेतला गेला होता.

एमसीए निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला हे संदीप पाटील यांचे व्याही आहेत. त्यामुळे एमसीएचे सध्याचे सचिव संजय नाईक यांनी पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला.

मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यामुळे संदीप पाटील यांचे अध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेतील स्थान वैध ठरले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनवर राजकीय वर्चस्व ठेवण्याची नेत्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे एमसीएच्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी युती केली आहे.

राजकारणातील कट्टर शत्रू असलेले नेते या निमित्ताने एकत्र आलेत. मात्र ही युती पाहून क्रिकेटपटूंनीदेखील नवा गट स्थापन केला आहे. संदीप पाटील यांनी हा गट स्थापन केला असून दोनच दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली.

विशेष म्हणजे पवार आणि शेलार यांच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे सेना या सर्वच पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.