AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणूक, महायुतीचं पारडं जड

शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये झालेल्या या निवडणुकीत नक्की कुणाचा विजय होईल याची उत्सुकता आता प्रत्येकाला लागली आहे.

औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणूक, महायुतीचं पारडं जड
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 19, 2019 | 10:05 PM
Share

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून (Aurangabad jalna vidhan parishad) निवडून येणाऱ्या एका जागेसाठी औरंगाबाद-जालन्यात मतदान प्रक्रिया पार पडली. औरंगाबाद आणि जालन्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Aurangabad jalna vidhan parishad) प्रतिनिधिंनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये झालेल्या या निवडणुकीत नक्की कुणाचा विजय होईल याची उत्सुकता आता प्रत्येकाला लागली आहे.

शिवसेनेकडून अंबादास दानवे आणि काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांपैकी कोण जिंकणार हे मतपेटीत बंद झालंय. 22 तारखेला मतमोजणी केली जाईल.

महायुतीचं पारडं जड

या निवडणुकीत पहिल्यापासून उत्सुकता खूप वाढली होती. पण चुरस मात्र दिसली नाही. कारण या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी मतदान करत असतात, ज्यात जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीचे प्रमुख पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी हे निवडणुकीचे मतदार असतात. सध्या औरंगाबाद-जालन्यात शिवसेना भाजपच्या मतदारांची संख्या जास्त आहे. यासाठी एकूण मतदार 657 इतके होते. यापैकी महायुतीकडे 330, महाआघाडीकडे 250तर एमआयएम-अपक्ष मिळून 77, मतदार आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेचं पारडं या निवडणुकीत जड समजलं जात होतं.

मतदारांचा शाही थाट

विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार हा मोठ्या प्रमाणात होत असतो. पण या निवडणुकीत मतांची बेरीज शिवसेना-भाजपच्या बाजूने असल्यामुळे घोडेबाजाराला फार वाव मिळाला नाही. पण तरीही धोका नको म्हणून शिवसेना-भाजपने आपले सगळे मतदार हे इगतपुरी इथल्या एका बड्या हॉटेलमध्ये तब्बल पाच दिवस मुक्कामाला ठेवले होते. तर काँग्रेसनेही आपल्या मतदारांची राज्यातल्या एका बड्या रिसॉर्टवर बडदास्त ठेवली होती. पण अपेक्ष उमेदवारांसाठी मात्र या निवडणुकीत घोडेबाजार झाला असावा, अशी शंका जाणकारांनी व्यक्त केली आहे.

दोन्ही उमेदवारांची धाकधूक कायम

शाही बडदास्त घेतलेले मतदार 19 तारखेला सकाळी आपल्या आपल्या मतदार केंद्रावर पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया ही किचकट स्वरुपाची असते, ज्यात पहिल्या पसंतीचं मतदान आणि दुसऱ्या पसंतीचं मतदान करावं लागतं. या पसंतीच्या मतदानाच्या फरकात गोंधळ झाला तर निकाल बदलू शकतो. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची निकाल लागेपर्यंत धाकधूक सुरू असते. त्यामुळे या निवडणुकीत बाणाच्या कपाळी गुलाल लागणार की काँग्रेसच्या पंजा हात उंचवणार हे येणाऱ्या 22 तारखेलाच कळेल.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप