AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामान्य बारामतीकर कुणाच्या बाजूने? दादा की साहेब? वाचा सविस्तर…

Baramati People on Ajit Pawar : अजित पवारांच्या निर्णयाबाबत बारामतीच्या लोकांना काय वाटतं? बारामतीकर कुणाच्या बाजूने? वाचा...

सामान्य बारामतीकर कुणाच्या बाजूने? दादा की साहेब? वाचा सविस्तर...
| Updated on: Jul 03, 2023 | 1:12 PM
Share

बारामती : अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीत फूट पडल्याचं शरद पवार यांनीही मान्य केलं. पण हे नेते परत येतील असाही विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते आता संभ्रमात आहेत. त्यांना आपण नक्की कुणाच्या बाजूने आहोत याबाबतची स्पष्टता येत नाहीये. अशात आम्ही शरद पवार यांच्या बारामतीतील स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

बारामतीकर नक्की कुणाच्या बाजूने आहेत. त्यांची प्रतिक्रिया आणि भावना काय आहेत? हे आम्ही जाणून घेतलं. तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा…

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवर बारामतीकरांच्या मनात काय? अजित पवारांनी घेतलेली भूमिका बारामतीकरांना मान्य आहे का? याबाबत बारामती शहराच्या मध्यभागी असलेल्या नगरपरिषद परिसरात आम्ही नागरिकांशी संवाद साधला.

आम्ही अजित पवारांसोबत आहोत कारण दादांनी बारामतीत खूप कामं केली आहेत. अजितदादांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.आम्हाला आनंदही वाटतोय की दादा उपमुख्यमंत्री झाले आणि दुसरीकडे वाईटही वाटतं आहे की ते शरद पवारसाहेबांसोबत नाहीत, असं मत बारामतीतील सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलं.

तर आम्हाला अजित पवार आणि सुप्रिया ताई दोघेही हवेत. आम्ही दोघांनाही निवडून देऊ. अजितदादांनी केलेली कृती आम्हाला मान्य नाही. त्यांनी असं करायला नको होतं, असंही काहींनी म्हटलं आहे.

शरद पवार यांची ताकद अवघा देश जाणून आहे. त्यामुळे पवारसाहेब आता दुसरा दगडाला शेंदूर फासून निवडून आणतील, असंही काहींनी म्हटलं आहे.

बारामतीहून पुण्याला जाणाऱ्या बसमधील नागरिकांशी आम्ही संवाद साधला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवर बारामतीकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

अजित पवारांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य आहे. अजितदादांनी अशीच प्रगती करावी. दादांनी जी विकास कामे केली आहेत ते थांबायला नको. त्यामुळे त्यांचं सत्तेत जाणं योग्यच आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत पण आता ते मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे, असं काही प्रवाशांनी म्हटलं.

तरुण लोकांनी घरातील जेष्ठांना विचारपूस करून निर्णय घ्यायला हवेत. अजितदादांनी घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. त्यांनी साहेबांना सोडायला नको होतं, असं काहींनी म्हटलं आहे.

एकूणच काय तर अजित पवार यांच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कुणी शरद पवार यांच्या बाजूने आहे तर कुणी अजित पवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.