AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवंत मान बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, भगत सिंहांच्या गावात शपथविधी

पंजाबला (Punjab)अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. आज आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित (Banwari Lal Purohit) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

भगवंत मान बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, भगत सिंहांच्या गावात शपथविधी
भगवंत मान
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 2:13 PM
Share

चंदीगढ : पंजाबला (Punjab)अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. आज आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित (Banwari Lal Purohit) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. थोर स्वातंत्र्य सौनिक भगत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलां या गावात मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आपच्या अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती. भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. पंजाबच्या इतिहासामध्ये प्रथमच पारंपरिक पक्षांना सोडून एक नवा पक्ष सत्तेत आला आहे. त्यामुळे पंजाबच्या जनतेमध्ये देखील मान यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. अखेर आज भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खटकर कलां गावात शपथविधीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काय म्हणाले मान?

भगवंत मान यांचा शपथविधी स्वातंत्र सैनिक भगत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलां या गावात झाला. यावेळी बोलताना भगवंत मान यांनी म्हटले की, खटकर कलां या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला एक खास कारण आहे. हे गाव भगत सिंह यांचे गाव आहे. अनेकजण राजवाड्यात आणि महालात शपथ घेतात. मात्र आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात जाऊन शपथ घेतली. ते कायम आमच्या ह्रदयात आहेत. मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल.

पंजाबमध्ये आपला बहुमत

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुंकाचे निकाल नुकतेच काही दिवसांपूर्वी लागले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसची सत्ता उलथून लावत निर्विवाद बहुमत मिळवले. पंजाबमध्ये आपचे तब्बल 92 आमदार निवडून आले आहेत. पंजाबच्या निवडणूक इतिहासात प्रथमच एका पक्षाला एवढे बहुमत मिळाले. अखेर आज आपचे भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

संबंधित बातम्या

फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल

VIDEO | अनाथ मुलांवर रंगांची बरसात, बीडच्या आमदारांचा अनोखा वाढदिवस, ‘झिंगाट’ने उत्साहाला उधाण!

सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, म्हणाले, ही तर हायकमांडची इच्छा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली