AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“फडणवीसांनी सांगितलं, सगळं वाचून झाल्याशिवाय मान वर कराल तर!”

निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. याचा सर्वाधिक फटका हा ठाकरे गटाला बसणार आहे. यावरून आरोप -प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

फडणवीसांनी सांगितलं, सगळं वाचून झाल्याशिवाय मान वर कराल तर!
Image Credit source: Google
| Updated on: Oct 10, 2022 | 11:21 AM
Share

ठाणे :  निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. याचा सर्वाधिक फटका हा ठाकरे गटाला बसणार आहे. निवडणूक आयोगाकडून केवळ धनुष्यबाण हे चिन्हच गोठवण्यात आलं नाही तर दोन्ही गटाला पुढील निर्णय येईपर्यंत पक्षाचं नाव देखील वापरता येणार नाहीये. यावरून आता दोन्ही गटाकडून एकोंमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाण्यात (thane) एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत त्यांना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा

भास्कर जाधव यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात मिमिक्री करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. भास्कर जाधव यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं संपूर्ण भाषण वाचून झाल्याशिवाय मान वर कराल तर याद राखा असं म्हणत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली.

दरम्यान पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या मणक्याचे ऑपरेशन झाले होते, मात्र आम्ही सर्व जण त्यांना म्हटलो तुम्ही चिंता करू नका आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. उद्धव ठाकरे यांनी ताठ मानेने भाषण केलं असं जाधव यांनी म्हटलं आहे.

आरोप -प्रत्यारोपाला उधाण

धनुष्यबाण या चिन्हावर एकाचवेळी दोन्ही गटाने दावा केल्यानं अखेर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. सोबतच दोन्ही गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणा नाहीये. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन्ही गटांकडून एकोंमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.