AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Kishor : ‘फक्त 30 ते 35 जागांसाठी भाजपाने…’, प्रशांत किशोर यांचा भाजपावर गंभीर आरोप

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी चालू लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला असला, तरी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे. एका मुद्यावरुन त्यांनी भाजपावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत. लगेचच भाजपाच्या प्रवक्त्याने त्याला उत्तरही दिलं. प्रशांत किशोर यांचा आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याच म्हटलं.

Prashant Kishor : 'फक्त 30 ते 35 जागांसाठी भाजपाने...', प्रशांत किशोर यांचा भाजपावर गंभीर आरोप
Prashant Kishor Prediction
| Updated on: May 24, 2024 | 10:53 AM
Share

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. त्यावरुन सत्ताधाऱ्यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर जुंपली आहे. प्रशांत किशोर राजकीय व्यवस्थापनात कुशल मानले जातात. जनमानसाची नाडी ओळखण्याचा गुण त्यांच्याकडे आहे. म्हणूनच अनेक राजकीय पक्षांनी त्यांची सेवा घेतली. देशातील वेगवेगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला असला, तरी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणावरुन भाजपावर टीका केली आहे. भाजपाने बिहारच भविष्य बदलण्यात इंटरेस्ट दाखवला नाही. बिहारच्या मागासलेपणासाठी त्यांनी भाजपाला जबाबदार धरलय.

माधेपुरामध्ये मीडियाशी बोलताना प्रशांत किशोर यांनी भाजपाला टोले लगावले. बिहारच्या भवितव्याचा विचार न करता नितीश कुमार यांच्या हाती राज्य सोपवल्याबद्दल प्रशांत किशोर यांनी टीका केली. “विविध पक्ष फोडून भाजपाने अन्य राज्यात सरकार बनवलं. पण 2020 विधानसभा निवडणुकीत जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकूनही बिहारच भवितव्य बदलण्याची जबाबदारी उचलली नाही” अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. ‘फक्त 42 आमदार असलेल्या नितीश कुमारांकडे राज्य सोपवलं’ असं प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांचा आरोप काय?

“नितीश कुमारांवर खूप प्रेम आहे, म्हणून भाजपाने असं केलं नाही. बिहारमधून 30-35 खासदार निवडून आणण्यासाठी त्यांना नितीश कुमारांबरोबरच समीकरण कायम ठेवयाचय म्हणून भाजपाने हे केलं” असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे. ‘बिहारच्या लोकांसोबत काय होईल? याची भाजपाला अजिबात चिंता नाहीय’ असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.

भाजपाने काय उत्तर दिलं?

बिहार भाजपाचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी प्रशांत किशोर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रशांत किशोर यांचे हे सर्व आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याच त्यांनी म्हटलं आहे. ‘भाजपाने जे काही केलं, ते राज्याच हित डोळ्यासमोर ठेऊन केलं’ असं भाजपा प्रवक्ते मनोज शर्मा म्हणाले. “पीकेला 2005 आधीची बिहारची स्थिती माहित नाही. जेडीयू आणि आम्ही दोघांनी मिळून बिहारची RJD च्या जंगलराजमधून सुटका केली. राज्य आणि पक्षाच हित डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने नितीश कुमार यांची मदत घेतली” असं मनोज शर्मा म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.