AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न : माणिकराव ठाकरे

राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केला (Maharashtra ReElections). तसेच, आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला

राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न : माणिकराव ठाकरे
| Updated on: Nov 10, 2019 | 1:37 PM
Share

मुंबई : राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केला (Maharashtra ReElections). तसेच, आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला (Manikrao Thackeray on BJP).

राज्यात सध्या सत्ता संघर्षावरुन मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातही सत्तास्थापनेबाबत खलबतं सुरु आहेत.

काँग्रेसने महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व आमदारांना सध्या जयपूरमध्ये हलवलं आहे. यावर माणिकराव ठाकरे म्हणाले, “तिथे पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी चर्चा करुन सर्वांची मतं जाणून घेणार आहेत. त्याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आमदारांची बैठक घेतली. यावेळी पक्ष नेतृत्त्व सर्व आमदारांचं ऐकतील आणि त्यांचं म्हणणं हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्यानंतर सोनिया गांधी या सर्व परिस्थितीवर जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल”.

महाराष्ट्रातील राजकारणाची एकूण परिस्थिती पाहता, भाजपची पावलं ही राज्याला निवडणुकीकडे ढकलण्याची असल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी ‘टीव्ही-9’शी बोलताना केला. “भाजप सध्या ज्याप्रकारे निर्णय घेत आहेत, त्यावरुन ‘आम्हाला नाही तर कोणालाच सरकार नाही’, अशी त्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट होतं”, असा घणाघात यावेळी माणिकराव ठाकरे यांनी केला. तसेच, त्यासाठी ते राज्यावर पुन्हा निवडणुका लादण्याच्या प्रयत्नात आहेत, असंही ते म्हणाले. मात्र, सत्तेसाठी आमचे प्रयत्न नाहीत, राज्याची एकूणच परिस्थिती पाहता या परिस्थितीत काय करता येईल, यासाठी सर्व आमदारांची ही चर्चा घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, राज्यावर पुन्हा निवडणूक लादण्याचा भाजपचा प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल, अशी भूमिका आमदारांची असल्याचंही ते म्हणाले.

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का?

भाजप किंवा शिवसेनेच्या विचारांशी आमचे विचार जुळणं शक्य नाही, मात्र आम्हाला राज्याची चिंता आहे, असं शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी माणिकराव ठाकरे म्हणाले. मात्र, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर हायकमांड निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय सर्वमान्य असेल, असंही त्यांनी सांगितलं. तरी यातून लवकरच मार्ग निघेल असंही त्यांनी सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.