AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EC Decision on NCP | ‘चपराक वैगेरे मी…’, राष्ट्रवादीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

NCP News | "2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला, त्यांना लोकशाही काय असते हे समजले आहे. लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. चपराक वैगेरे मी म्हणत नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

EC Decision on NCP | 'चपराक वैगेरे मी...', राष्ट्रवादीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
devendra fadnavis
| Updated on: Feb 07, 2024 | 8:21 AM
Share

मुंबई : भविष्यात महाराष्ट्रात एक वेगळ राजकारण पहायला मिळू शकतं. राजकारणाची दिशा बदलणारा एक महत्त्वाचा निर्णय आला आहे. बऱ्याच दिवसांपासून राजकीय जाणकारांपासून सगळ्यांचाच या निर्णयाकडे लक्ष लागलं होतं. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? हे उत्तर मिळाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल आहे. यापुढे अजित पवार गट अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाने अर्ज करायला सांगितला आहे. शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता, तसाच निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. “हा अपेक्षित निर्णय आहे, कारण मागील अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, समाजवादी पार्टी संदर्भात जेव्हा वाद उभा राहिला होता किंवा इतर पाच प्रकरणात इलेक्शन कमिशनची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे” अस देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो निर्णय लोकशाहीत महत्वाचा असतो” असं ते म्हणाले.

‘वेळोवेळी पार्टीचे संविधान कसं होत?’

“पक्षाचे संविधान आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकार त्यांच्या नेतृत्वात उत्तम काम करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बहुमताला महत्व आहेच, केवळ बहुमताच्या आधारावर निर्णय झाला नाही, तर इतर सर्व बाबीचा विचार झाला. वेळोवेळी पार्टीचे संविधान कसं होत? निवडणुका झाल्या की नाही? आता पक्ष कोणाचा आहे? याचा विचार झाला आहे” असं देवेद्र फडणवीस म्हणाले.

“2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला, त्यांना लोकशाही काय असते हे समजले आहे. लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. चपराक वैगेरे मी म्हणत नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....