AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असताना शिवाजी कर्डिले (BJP Leader Shivaji Kardile) यांनी राज्यात भाजप सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले
शिवाजीराव कर्डीले
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 27, 2020 | 9:30 PM
Share

अहमदनगर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्यात थोड्या दिवसात भाजपचे सरकार येणार आहे, असा दावा भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले (BJP Leader Shivaji Kardile) यांनी केला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात शनिवारी (26 सप्टेंबर) मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असताना शिवाजी कर्डिले यांनी राज्यात भाजप सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहावर शिवाजी कर्डिले (BJP Leader Shivaji Kardile), महापौर बाबासाहेब वाकळे आणि भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांच्यात आज (27 सप्टेंबर) बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेज जण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काही दिवसांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. भाजपची केंद्रात सत्ता आहेच, पण आता राज्यातही सत्ता येईल. राज्यात भाजपची सत्ता येणार असल्यामुळेच ते आमच्या संपर्कात आहेत. याशिवाय आगामी काळात नगरमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बरेच नगरसेवक आमच्यासोबत येतील”, अशी प्रतिक्रिया शिवाजी कर्डिले यांनी दिली.

भाजप नगरसेवक मनोज कोतकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही कर्डिले यांनी प्रतिक्रिया दिली. “कोतकर स्वत:च्या स्वार्थ आणि पदासाठी राष्ट्रवादीत गेले असतील. त्याबाबत आमचे शहराध्यक्ष आणि महापौरांनी खुलासा केला आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची त्याबाबतचा निर्णय आमचे शहराध्यक्ष घेतील”, असं कर्डीले यांनी सांगितलं.

नगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीअगोदर नगरमध्ये राजकीय भूकंप घडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे उमेदवार मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

विशेष म्हणजे भाजपवासी असतानाही मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांच्या प्रवेशाने राजकीय भूकंप आल्याची चर्चा नगरच्या राजकारणात रंगली. अखेर शिवसेनेच्या पाठींब्यामुळे मनोज कोतकर यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली.

मात्र, स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीनंतरही नगरमधील राजकीय घडामोडी सुरुच आहेत. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे आणि भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांच्यात आज बैठक झाली. पुढच्या काही महिन्यांमध्ये महापौरपदाची निवडणूक आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी