पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल

दुसरा टप्पा 21ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान 11 दिवसांचा असणार असून तो नंदुरबार येथून सुरू होत असल्याची माहिती यात्रा (Mahajanadesh Yatra) प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे पहिल्या टप्प्यातील यात्रा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली होती.

पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 8:23 PM

उस्मानाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा (Mahajanadesh Yatra) पूर्वनियोजित दुसरा टप्पा 5 दिवस पुढे ढकलला आहे. दुसरा टप्पा 21ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान 11 दिवसांचा असणार असून तो नंदुरबार येथून सुरू होत असल्याची माहिती यात्रा (Mahajanadesh Yatra) प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे पहिल्या टप्प्यातील यात्रा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली होती.

महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे , 55 मतदारसंघात जाणार आहे. यात 39 जाहीर सभा, तर 50 स्वागत सभा होतील. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 1839 किमी प्रवास करणार असून समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर होणार असल्याचं आमदार ठाकूर म्हणाले. सांगली, कोल्हापूर येथील पूरस्तिथीमुळे 3 दिवस अगोदरच पहिला टप्पा बंद झाला होता, जो आता सुरू होणार आहे.

पूरग्रस्त भाग असलेले पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळले असल्याची माहिती यात्रा प्रमुख आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी दिली. यापूर्वी 17 तारखेपासून दुसरा टप्पा सुरु होणार होता आणि 31 ऑगस्टला महाजनादेश यात्रेचा समारोप होणार होता. पण राज्यातील पूर परिस्थितीची आपत्ती लक्षात घेत या दौऱ्याच्या नियोजनात बदल करण्यात आलाय.

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 6 ऑगस्टला अकोला येथे जाहीर सभेनंतर दौऱ्याचा पहिला टप्पा सोडला होता. 09 ऑगस्टला दौऱ्याचा पहिला टप्पा नंदुरबार येथे संपणार होता. पण कोल्हापूर, सांगलीमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण पूरपरिस्थितीसाठी विशेष बैठक आणि मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री मुंबईत परतले. मुख्यमंत्री मुंबईत परतले त्या रात्री भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं होतं.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.