AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“औरंगाबादचं नाव बदलायला सांगितलं यांनी विमानतळाचं बदललं, मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच म्हणू का?”

आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) करा अशी मागणी केली होती", असं नितेश राणे म्हणाले.

औरंगाबादचं नाव बदलायला सांगितलं यांनी विमानतळाचं बदललं, मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच म्हणू का?
उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 07, 2021 | 11:42 AM
Share

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Sarkar) हल्लाबोल केला. “आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (BJP MLA Nitesh Rane attacks on CM Uddhav Thackeray over Aurangabad renaming issue)

औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेलामहाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले.

शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेसवर निशाणा

यावेळी नितेश राणेंनी दिल्लीतील काँग्रेस आंदोलनावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. “विरोध कुठे आणि काशासाठो होतोय हे महत्त्वाचं आहे. विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांचं हित साधायचं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या रॅलीमध्ये लोकांना बोलवावं लागत नाही. कोकणातील शेतकरी कृषी कायद्याचं स्वागत करत आहेत. काँग्रेसने 2019 च्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला. काँग्रेस बोलत राहिले पण पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलं, असं नितेश राणे म्हणाले.

शेतकरी संघटना आतून या कायद्याला समर्थन देत आहेत. राज्यात या कायद्याबाबतीत राष्ट्रवादीची भूमिका काय? शिवसेनेला कायदे कळले तरी आहेत का? काँग्रेसला फक्त विरोध करायचा आहे. राहुल गांधी वायनाडमधून निवडून येऊ शकतात मग कोकणातील शेतकरी बाहेर माल का विकू शकत नाही? असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले.

(BJP MLA Nitesh Rane attacks on CM Uddhav Thackeray over Aurangabad renaming issue)

संबंधित बातम्या 

सिंधुदुर्गात नितेश राणेंचा शिवसेनेला पुन्हा धक्का 

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग त्यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? नितेश राणेंचं टीकास्त्र 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.