AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“औरंगाबादचं नाव बदलायला सांगितलं यांनी विमानतळाचं बदललं, मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच म्हणू का?”

आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) करा अशी मागणी केली होती", असं नितेश राणे म्हणाले.

औरंगाबादचं नाव बदलायला सांगितलं यांनी विमानतळाचं बदललं, मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच म्हणू का?
उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 07, 2021 | 11:42 AM
Share

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Sarkar) हल्लाबोल केला. “आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (BJP MLA Nitesh Rane attacks on CM Uddhav Thackeray over Aurangabad renaming issue)

औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेलामहाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले.

शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेसवर निशाणा

यावेळी नितेश राणेंनी दिल्लीतील काँग्रेस आंदोलनावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. “विरोध कुठे आणि काशासाठो होतोय हे महत्त्वाचं आहे. विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांचं हित साधायचं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या रॅलीमध्ये लोकांना बोलवावं लागत नाही. कोकणातील शेतकरी कृषी कायद्याचं स्वागत करत आहेत. काँग्रेसने 2019 च्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला. काँग्रेस बोलत राहिले पण पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलं, असं नितेश राणे म्हणाले.

शेतकरी संघटना आतून या कायद्याला समर्थन देत आहेत. राज्यात या कायद्याबाबतीत राष्ट्रवादीची भूमिका काय? शिवसेनेला कायदे कळले तरी आहेत का? काँग्रेसला फक्त विरोध करायचा आहे. राहुल गांधी वायनाडमधून निवडून येऊ शकतात मग कोकणातील शेतकरी बाहेर माल का विकू शकत नाही? असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले.

(BJP MLA Nitesh Rane attacks on CM Uddhav Thackeray over Aurangabad renaming issue)

संबंधित बातम्या 

सिंधुदुर्गात नितेश राणेंचा शिवसेनेला पुन्हा धक्का 

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग त्यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? नितेश राणेंचं टीकास्त्र 

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.