AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिला’, रवी राणांचा आरोप

Ravi Rana Press conference in Delhi : संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे, मुख्यमंत्र्यांनी सीपींना फोन लावून सांगितलं की रवी राणाला अटक करा, असंही त्यांनी म्हटलंय.

'कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिला', रवी राणांचा आरोप
रवी राणा यांचा मविआ सरकारवर गंभीर आरोप!
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 1:06 PM
Share

नवी दिल्ली : भाजपचे नेते विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असा संघर्ष आता पुन्हा पेटू लागला आहे. भाजप आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर (Major allegation on Maharashtra CM Uddhav Thackeray) आरोप केले आहेत. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, असा आदेशच उद्धव ठाकरेंनी दिल्याचं रवी राणा (BJP MLA Ravi Rana) यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांच्या मदतीनं दबावतंत्र महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) वापरलं जात असल्याचा आरोप रवी राणांनी केलाय. देशात शाईफेकीच्या घटना घडल्या, पण 307 म्हणजेच जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला, यातून नेमकं काय प्रतीत होत असा प्रश्न रवी राणा यांनी उपस्थित केलाय.

संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे, मुख्यमंत्र्यांनी सीपींना फोन लावून सांगितलं की रवी राणाला अटक करा, असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर संजय राऊतांवरही 506 चा गुन्हा दाखल करा असं थेट आव्हान रवी राणा यांनी यावेळी दिलं. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे, अनिल परबच्या प्रॉपर्टींवर कारवाई होईल, आणि मीही पुरावे देईन, असे आरोप आमदार रवी राणा यांनी केले आहेत.

आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न!

महिला बालकल्याणचा घोटाळा काढला, स्मृती इराणींनी आदेश देऊन चौकशी लावली, या सगळ्यामुळे द्वेषाच्या भावनेने हे सगळं सुरु आहे, पालकमंत्रीही पोलिसांवर दबाव टाकत आहे. महाराष्ट्रात मी लवकरच जाईल, मी माहिती घेत आहे, 80-80 वर्षांच्या वयोवृद्ध कार्यकर्त्यांना अटक केली, पोलीस किचनपर्यंत जाऊन अटक करत आहेत, मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांच्या इशाऱ्याने हे सगळं सुरु आहे, असा आरोप रवी राणा यांनी म्हटलं. राणेप्रमाणेच राणांनाही अकडवण्यासाठीचे सगळे प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुरु आहेत.

नवनीत राणांना घेरण्याचा प्रयत्न केला, पण घाबरणार नाही, आम्ही दोघेही जेलमध्ये जायला तयार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी सातत्यानं केला.

पाहा रवी राणा यांची संपूर्ण पत्रकार परिषद Uncut :

काय आहे नेमकं शाई प्रकरण?

छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीतील (Amravati) राजकारण चांगलंच तापलंय. शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकून निषेध नोंदवल्याचा आरोप झाला होता. बुधवारी दुपारी आष्टीकरांसमोर महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि पुतळा का हटवला, याचा जाब विचारत त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली होती. त्यानंतर कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आता रवी राणा यांनी मविआ सरकारवर गंभीर आरोप केलेत.

अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्या अंगावर शाईफेक केल्या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीतील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा नेमकं शाईफेकीदरम्यान, काय घडलं होतं?

संबंधित बातम्या :

Nagpur | नितीन गडकरींच्या घरासमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

आमच्या नद्यांमध्ये बेवारस प्रेतं फेकली नाहीत, अन् महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर म्हणता, राऊतांचे मोदींना उत्तर

तो माझ्यावर दगड भिरकावणार, हे पाहूनही पोलिसांनी काहीच केलं नाही, गृहसचिवांच्या भेटीनंतर सोमय्यांचा आरोप

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.