AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या ‘पितृपक्ष’ संपणार… उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारी टीका कुणाची?

मनसे, भाजप आणि शिंदे गटाकडून त्यांना जोरदार आव्हान मिळणार हे निश्चित आहे. पण या सर्व टीकांना उद्धव ठाकरे कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय.

उद्या ‘पितृपक्ष’ संपणार… उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारी टीका कुणाची?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 24, 2022 | 12:44 PM
Share

मुंबईः उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळं आहेत. ते कर्तव्यशून्य आहेत, अशी थेट टीका दोन दिवसांपूर्वी मनसेनं केली. त्यानंतर आता भाजपकडून उद्धव ठाकरेंकडे दिशानिर्देश करणारं याच प्रकारचं सूचक वक्तव्य आलंय. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हे सूचक ट्विट केलंय. उद्या पितृपक्ष संपणार, असं वक्तव्य त्यांनी केलंय. हा इशारा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडे असल्याची जोरदार चर्चा आहे.   शिवसेनेची शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होते की काय अशी स्थिती होती. मात्र हायकोर्टानं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बाजूने निकाल दिल्यानंतर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार हे स्पष्ट आहे. सध्या शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं म्हटलं जातंय. शिंदे गट सुप्रीम कोर्टातही धाव घेण्याच्या तयारीत आहे. अशातच भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेनेच्या जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा?

उद्धव ठाकरेंना मिळालेलं शिवसेनाप्रमुख पद आणि संपूर्ण पक्षाची ताकद ही बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई आहे. त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंचं हे वैभव आहे, अशी टीका अनेकदा केली जाते. वडिलांमुळेच शिवसेनेचा वारसा उद्धव ठाकरेंना मिळाला, असंही उघड बोललं जातं. त्यामुळे केशव उपाध्ये यांनी केलेलं ट्विट उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागण्याची दाट शक्यता आहे…

मनसेनंही बांडगुळ म्हटलं…

उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी मनसेनेही अशीच जिव्हारी लागणारी टीका केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट बोलूनही दाखवलं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळं आहेत. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व शून्य आहे. कमजोर मुलावर आई- वडिलांचं प्रेम जास्त असतं, पण कर्तृत्ववान मुलावर त्यांचा विश्वास असतो, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी 22 सप्टेंबर रोजी केलं होतं.

तर आज पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. मैदान मिळालंय, पण तिथं बाळासाहेबांचे विचारच मांडा. उगाच शिव्या दिल्या तर मैदान मिळून काय उपयोग आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच मशिदीवरील भोंगे, अनधिकृत मदरसे आणि मराठी माणसं मुंबई सोडून का चाललेत, या तीन मुद्द्यांवर बोला, असं आव्हान मनसेनं दिलंय..

उद्धव ठाकरें प्रत्युत्तर देणार?

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे. त्यानंतर मनसे, भाजप आणि शिंदे गटाकडून त्यांना जोरदार आव्हान मिळणार हे निश्चित आहे. पण या सर्व टीकांना उद्धव ठाकरे कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.