AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका

मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे.

मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका
| Updated on: Sep 19, 2020 | 3:21 PM
Share

कोल्हापूर : “मुंबईतील 144 कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आहे (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt)”, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सरकारवर केला आहे. “कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा”, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt).

“मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे. मात्र, कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा. यावर्षी 642 कोर्सेस ना निम्मी फी सरकार भरणार हे घोषित करा, दहा लाखाचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा”, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

“गेले तीन महिने व्याज भरलेली परतावा बँकेच्या खात्यात झालीच नाही आहे. सारथीची पूर्ण वाट लावलेली आहे. ती पुन्हा रिव्हाई करा. अजित पवार हे डायनामिक नेते आहेत. सरकारमध्ये मोठा प्रॉब्लेम हा निर्णयाच्या स्पीचचा आहे. निर्णय लवकर होत नाहीत. घोंगडी भिजत पडले, अजित पवारांकडे हा विषय आल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत”, असंही ते म्हणाले.

यांची बालीश वक्तव्य फक्त भुलवण्याकरता – अमोल मिटकरी

“चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला सिरीअसली घ्यायची गरज नाही. यांची बालीश वक्तव्य फक्त भुलवण्याकरता आहेत. कोरोना सोडून यांना इतर मुद्दे सुचत आहेत. मागच्या पाच वर्षात तुम्ही घाबरले होते. म्हणून मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल झाले होते. मराठा आरक्षणासंदर्भात आमचं सरकार सकारात्मक एनवेळी काहीतरी सोडायचं आणि दिशाभुल करायची ही पध्दत आहे”, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt).

Chandrakant Patil Criticize Thackeray Govt

संबंधित बातम्या :

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस

क्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावेल : उदयनराजे

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....