मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका

मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे.

मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका
Follow us
| Updated on: Sep 19, 2020 | 3:21 PM

कोल्हापूर : “मुंबईतील 144 कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आहे (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt)”, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सरकारवर केला आहे. “कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा”, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt).

“मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे. मात्र, कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा. यावर्षी 642 कोर्सेस ना निम्मी फी सरकार भरणार हे घोषित करा, दहा लाखाचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा”, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

“गेले तीन महिने व्याज भरलेली परतावा बँकेच्या खात्यात झालीच नाही आहे. सारथीची पूर्ण वाट लावलेली आहे. ती पुन्हा रिव्हाई करा. अजित पवार हे डायनामिक नेते आहेत. सरकारमध्ये मोठा प्रॉब्लेम हा निर्णयाच्या स्पीचचा आहे. निर्णय लवकर होत नाहीत. घोंगडी भिजत पडले, अजित पवारांकडे हा विषय आल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत”, असंही ते म्हणाले.

यांची बालीश वक्तव्य फक्त भुलवण्याकरता – अमोल मिटकरी

“चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला सिरीअसली घ्यायची गरज नाही. यांची बालीश वक्तव्य फक्त भुलवण्याकरता आहेत. कोरोना सोडून यांना इतर मुद्दे सुचत आहेत. मागच्या पाच वर्षात तुम्ही घाबरले होते. म्हणून मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल झाले होते. मराठा आरक्षणासंदर्भात आमचं सरकार सकारात्मक एनवेळी काहीतरी सोडायचं आणि दिशाभुल करायची ही पध्दत आहे”, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला (Chandrakant Patil Criticize Thackeray Govt).

Chandrakant Patil Criticize Thackeray Govt

संबंधित बातम्या :

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस

क्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावेल : उदयनराजे

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.