AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाचाही ‘बाप’ काढला नाही, ‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द; चंद्रकांत पाटलांची सारवासारव

चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीपासून ते शाळा सुरू होण्याच्या मुद्द्यापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरही खुलासा केला.

कुणाचाही 'बाप' काढला नाही, 'बाप' हा सहज वापरला जाणारा शब्द; चंद्रकांत पाटलांची सारवासारव
| Updated on: Oct 15, 2020 | 12:11 PM
Share

कोल्हापूर: बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही, अशी सारवासारव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. (chandrakant patil reaction on his statements)

चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीपासून ते शाळा सुरू होण्याच्या मुद्द्यापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरही खुलासा केला. आपल्या मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. त्यापैकी बाप हा सुद्धा एक शब्द आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत, असं मी म्हणालो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

काल राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनीही या शब्दावरून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी बोलू नये. देशातील 130 कोटी जनता आहे मोदींना बाप म्हणायला, असं सांगतानाच कोणाची बाप काढण्याची माझी संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला.

विद्यार्थ्यांची ओढताण का करताय?

यावेळी त्यांनी शाळा सुरू होण्याच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली. शाळा सुरू होणार होणार असं हे सरकार सांगतं पण कधी सुरू होणार हे सांगत नाही. शालेय विद्यार्थ्यांची ओढताण तरी का करता? 1 जानेवारीपासून शाळा सुरू होणार हे एकदाच जाहीर तरी करा. म्हणजे मुलं टेन्शन मुक्त होतील. तबला, डान्स क्लास तरी लावतील, असं सांगतानाच शैक्षणिक वर्षे 1 जानेवारी ते डिसेंबर करा, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकार तुमचं आहे, खुशाल ‘जलयुक्त’ची चौकशी करा

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ‘कॅग’च्या अहवालातील सर्व आरोप फेटाळून लावले. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढला की नाही, हे राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. या योजनेमुळे जमिनीखालील पाणीसाठी वाढला. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. परिणामी शेतकरी दोन-दोन पिकं घेऊ लागले होते, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यासही सुरुवात केली. तर औरंगाबाद आणि जालना यासारख्या भागात लागणाऱ्या पाण्याच्या टँकर्सची संख्याही घटली होती. (chandrakant patil reaction on his statements)

मात्र, ‘कॅग’च्या अहवालात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला नाही. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत संपूर्ण राज्यभरात एकूम 6,41,560 कामे झाली. परंतु, ‘कॅग’कडून यापैकी फक्त 1128 कामंच तपासण्यात आली. ही टक्केवारी अवघी 0.17 टक्के इतकी आहे. एकूण 22589 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना पोहोचली असताना केवळ 120 गावांच्या पाहणीवरून योजनेचे मूल्यमापन कसे काय होऊ शकते, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या:

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

(chandrakant patil reaction on his statements)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.