जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढला की नाही, हे राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे | Jalyukt shivar scheme

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 11:42 AM

मुंबई: सरकार तुमचं आहे. तुम्ही दोषींवर कारवाई करू शकता. पण वस्तुस्थिती काय आहे हे पाहा, असं सांगतानाच जलयुक्त शिवाराचं काम पूर्ण होण्यासाठी मोठा जनसहभाग होता. गावागावात कामे झाली. आता या जनसहभागाचीही चौकशी करणार का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant Patil on Jalyukt shivar scheme SIT probe)

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जलयुक्त शिवारमध्ये ९ हजार कोटी वापरले होते. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशीही माहिती उघड झाली आहे. याशिवाय, ‘कॅग’च्या अहवालातही जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ‘कॅग’च्या अहवालातील सर्व आरोप फेटाळून लावले. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढला की नाही, हे राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. या योजनेमुळे जमिनीखालील पाणीसाठी वाढला. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. परिणामी शेतकरी दोन-दोन पिकं घेऊ लागले होते, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यासही सुरुवात केली. तर औरंगाबाद आणि जालना यासारख्या भागात लागणाऱ्या पाण्याच्या टँकर्सची संख्याही घटली होती.

मात्र, ‘कॅग’च्या अहवालात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला नाही. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत संपूर्ण राज्यभरात एकूम 6,41,560 कामे झाली. परंतु, ‘कॅग’कडून यापैकी फक्त 1128 कामंच तपासण्यात आली. ही टक्केवारी अवघी 0.17 टक्के इतकी आहे. एकूण 22589 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना पोहोचली असताना केवळ 120 गावांच्या पाहणीवरून योजनेचे मूल्यमापन कसे काय होऊ शकते, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

‘शिवार’ जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले? रोहित पवारांचा भाजपला टोला

ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी ₹ खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली, याची चौकशी होण्याची गरज होती. राज्य सरकारने योजनेच्या चौकशीचे आदेश दिल्यामुळे ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला.

संबंधित बातम्या:

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

जलयुक्त शिवाराची ओपन चौकशी होईल; भाजपने घाबरून जाऊ नये; जयंत पाटलांचा खोचक टोला

Special Report | फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची SIT द्वारे चौकशीचे आदेश!

(Chandrakant Patil on Jalyukt shivar scheme SIT probe)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.