AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : उखाड फेकेंगे! 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवणार; जेडीयूचा दावा

Nitish Kumar : बिहारमध्ये नवं सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आरजेडीचा समावेश झाला आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांनी बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Nitish Kumar : उखाड फेकेंगे! 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवणार; जेडीयूचा दावा
उखाड फेकेंगे! 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवणार; जेडीयूचा दावाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2022 | 7:30 AM
Share

पाटणा: जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारमध्ये भाजपशी (bjp) काडीमोड करून आरजेडीशी (rjd) युती केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला सोडल्यानंतर आता 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जेडीयूच्या नेत्यांनी तर या तयारीच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करण्यासही सुरुवात केली आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी काल लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तास सव्वातास चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवण्यात येणार आहे, असं ललन सिंह यांनी सांगितलं. येत्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी आणि जेडीयू मिळून निवडणुका लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ललन सिंह हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला.

2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिहारमधून हद्दपार करण्यासाठी लालूप्रसाद यादव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. लालू यांनी भाजपला 40 जागांवर पराभूत करण्याचं टार्गेट ठेवा असं सांगितलं. बिहारबरोबरच बंगाल आणि झारखंडमध्येही भाजपला पराभूत करायचं आहे, यावरही आम्ही भर देणार आहोत, असं ललन सिंह यांनी सांगितलं.

खाते वाटपावर तेजस्वी यांच्याशीच चर्चा

खाते वाटपावर लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा झाली का? असा सवाल खाते वाटपावर चर्चा झाली नाही. कुणाला कोणती खाती द्यायची आहे, याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा करून घेतला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

24 ऑगस्टला बहुमत सिद्ध करणार

बिहारमध्ये नवं सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आरजेडीचा समावेश झाला आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांनी बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. या महाआघाडीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांचाही समावेश आहे. 15 ऑगस्टनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी नितीश कुमार हे विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम