AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या

मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज  सायंकाळी थंडावल्या. 23 एप्रिलला होणाऱ्या या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होईल. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला मतदार काय प्रतिसाद देतात हे 23 मे रोजी निकालावरुनच स्पष्ट होईल. मागील काही काळात राज्यभरात निवडणूक प्रचाराचा धुरळा […]

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज  सायंकाळी थंडावल्या. 23 एप्रिलला होणाऱ्या या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होईल. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला मतदार काय प्रतिसाद देतात हे 23 मे रोजी निकालावरुनच स्पष्ट होईल.

मागील काही काळात राज्यभरात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यात सत्ताधारी पक्षांसोबत सर्वच विरोधी पक्षांचाही समावेश होता. भाजपकडूनही पंतप्रधान मोदींसह भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रचाराच्या रणधुमाळीत पूर्ण ताकदीने उतरले. रॅली, रोड शोसोबतच चौक सभा, घरोघरी भेटीगाठी याचाही प्रचारात वापर झाला. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचारात मेहनत घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आदींनीही आपल्या प्रचार भाषणांतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या.

मनसेने तर निवडणुकीत सहभाग नसतानाही महाराष्ट्रभर भाजपविरोधी आघाडी उघडली. त्यांच्या सभांमध्ये प्रचाराचा वेगळाच पॅटर्न पाहिला मिळाला. विरोधकांची जुनी आश्वासने आणि सध्याचे वास्तव यावर आधारित राज ठाकरेंच्या भाषणांनी भाजपला चांगलेच जेरीस आणले. तिसऱ्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या टप्प्यात 14 जागांवर मतदान होईल.

तिसऱ्या टप्प्यात ‘या’ ठिकाणी मतदान होणार

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

या टप्प्यातील लक्षवेधी लढती:

बारामती:  सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध कांचन कुल (भाजप)

माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विरुद्ध संजय शिंदे (राष्ट्रवादी)

अहमदनगर: सुजय विखे (भाजप) विरुद्ध संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)

रायगड: अनंत गीते  (शिवसेना) विरुद्ध सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत  (शिवसेना) विरुद्ध नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.