AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते विधान भोवलं… मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांना ताबडतोब मुंबईला बोलावलं?

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या भलतेच चर्चेत आहेत. त्यांच्या दोन विधानांमुळे ते चर्चेत आले आहेत. सावंत यांनी एक विधान शेतकऱ्यांच्या विरोधात केलंय. तर दुसरं विधान थेट मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधात केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

ते विधान भोवलं... मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांना ताबडतोब मुंबईला बोलावलं?
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 31, 2024 | 6:06 PM
Share

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवलं आहे. तानाजी सावंत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून कडक शब्दात प्रतिक्रिया उमटली होती. या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट तानाजी सावंत यांना मुंबईला भेटीसाठी बोलावलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच सावंत हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या बाजूला बसल्यावल उल्टी आल्यासारखं होतंय, असं विधान केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्याने आणि सरकारमधील मंत्र्याने हे विधान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तानाजी सावंत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याचीच दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी सावंत यांना भेटायला बोलावलं असल्याचं समजतं. या भेटीत शिंदे यांच्याकडून सावंत यांना समज दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे.

भाषणाची क्लिप परत ऐका

दरम्यान, तानाजी सावंत यांनी मीडियाशी संवाद साधताना त्या विधानावरून मीडियावरच खापर फोडलं. तुमच्या मीडियाने नेरेटिव्ह सेट केला आहे. तो चुकीचा आहे. त्या भाषणाची क्लिप परत ऐका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसताना उलटी होते हा विषय आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार 2022च्या अगोदर होतं. तुम्ही जे तोडमोड करून दाखवताना, जरा सदसदविवेकबुद्धीला जागून बातम्या द्यायला शिका. एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे, असं तानाजी सावंत म्हणाले.

सावंत भडकले

यावेळी सावंत अत्यंत संतापलेले होते. तावातावाने बोलत होते. माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा सावंत करत होते. तसेच या सर्व प्रकाराला ते मीडियालाच जबाबदार धरताना दिसत होते. यावरून सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावलं असावं असा कयास वर्तवला जात आहे.

आव्हाडांचा चिमटा

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतली आहे. तानाजी सावंत यांना 3 लाखाची गाडी 30 लाखाला पास करून घ्यायची होती. त्या फाईलवर अजित पवार यांनी सही करण्यास नकार दिला. म्हणूनच सावंत यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात विधान केल्याचा चिमटा जितेंद्र आव्हाड यांनी काढला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.