“लक्ष असतं आमचं! चुकीचे निर्णय घ्याल तर याद राखा”, नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दम…

नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालाय. या नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सावधानतेचा इशारा दिला आहे.

लक्ष असतं आमचं! चुकीचे निर्णय घ्याल तर याद राखा, नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दम...
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 7:43 AM

मुंबई : नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालाय. जुन्याच चेहऱ्यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. “चांगला कारभार करा. तुमच्यावर आमची नजर आहे हे लक्षात ठेवा. चुकीचे निर्णय घेतले तर तुमचे समर्थन करणार नाही. मंत्र्यांनी एकमेकांवर टीका केली तर याद राखा”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व नव्या मंत्र्यांना मंत्रालयातील बैठकीत दम भरला असल्याची माहिती आहे. लक्ष आहे आमचं, असं म्हणत त्यांनी मंत्र्यांना इशारा दिलाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांचं (New Minister) ‘बौद्धिक’ घेतलं.

शिंदे गटातल्या मंत्र्यांना तर चांगलीच तंबी दिल्याची माहिती आहे. शिंदे गट व भाजपचे नवनिर्वाचित मंत्री आणि मंत्रीपदावर वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेल्यांमधील मतभेद कोणत्याही क्षणी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतभेद आणि परस्परांवर टीका करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे नव्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीला नवनिर्वाचित मंत्री सुधीर मुनगंटीवार वगळता सर्व नवीन मंत्री उपस्थित होते. सर्वांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळेस चुकीचे निर्णय घेणाऱ्यांची बाजू घेतली जाणार नाही. तुमच्या चुकांवर पांघरूण घातले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारच्या ताकदीमुळे राज्यात नवे सरकार स्थापन झाल्याची जाणीव या बैठकीत सर्व मंत्र्यांना करून देण्यात आली. केंद्रांच्या योजनांच्या अंमलबजावणीची आठवणही करून देण्यात आली. केंद्र सरकारने राज्याला मागील अडीच वर्षांत केंद्रीय योजनांबाबत स्मरणपत्रे पाठवली, पण योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे केंद्राच्या योजनांची राज्यात अंमलबजावणी करून महाराष्ट्र राज्य केंद्र सरकारसोबत आहे, हे आपल्याला केंद्राला दाखवून द्यायचं आहे, असंही या बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.