AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका गाडीत बसलो नसलो, तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो : उद्धव ठाकरे

नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे त्याला मी कधी मागे पडू देणार नाही," असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले.

एका गाडीत बसलो नसलो, तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो : उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 28, 2020 | 1:43 PM
Share

नागपूर : बहुप्रतिक्षित लोकमान्यनगर ते बर्डी या अ‍ॅक्वामार्गावर मेट्रोच्या सेवेचे लोकापर्ण आज (28 जानेवारी) (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray)  करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून प्रकल्पाचे उद्धाटन केले. हे उद्धाटन झाल्यानंतर दुपारी 2 पासून प्रवासी फेऱ्या सुरु होणार आहेत. फक्त 20 मिनिटात 20 रुपयात नागपूरकरांना सीताबर्डी ते लोकमान्यनगर असा प्रवास करता येणार आहे.

या मेट्रोचे उद्धाटन करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी भाषण केले. यावेळी भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख माझे मित्र म्हणून केला. “आपण एका गाडीत बसलो नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आलो आहे. नागपूर मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना धन्यवाद,” असे नितीन गडकरींबाबत उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी कधी श्रेय घेतलं नाही, आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. आम्हाला फक्त लोकांचा आशिर्वाद पाहिजे. याचं श्रेय जनतेला जातं. नागपुरात सुरु असलेले प्रकल्प कधीच थांबवले जाणार नाही. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे त्याला मी कधी मागे पडू देणार नाही,” असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले.

या दरम्यान उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचेही आभार मानले. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस पूर्ण करण्याचा काम नितीन गडकरींनी केले. ते अत्यंत अभ्यासू माणूस असून ते भाषण सुद्धा अभ्यासपूर्वक करतात,” असेही ते म्हणाले.

“एखादं स्वप्न पाहण ते पूर्ण करणं यात फार फरक असतो. नुसती माहिती वाचून दाखवणं याला भाषण म्हणत नाहीत,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“आपण जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे माझी मेट्रो असं जे नाव दिले ते योग्य आहे. त्याचं मेट्रोचं लोकार्पण करत आहोत. मात्र प्रवास करताना त्याची स्वच्छता आणि निगा राखणं हे आपलं काम आहे. जर स्वच्छता आणि निगा राखली गेली तर माझ्या मुंबईची, नागपूरची आणि महाराष्ट्रातील मेट्रो बघण्यासाठी परदेशातून व्यक्ती येतील,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) केला.

“नागपूर विमानतळाची निविदा आहे. ती लवकरच मार्गी लावू. तसेच राज्यातील प्रकल्पांसाठी केंद्राने लवकर मंजुरी द्याव्या. मी आणि गडकरी आपण जर दोघं ही समन्वय साधून राज्यासाठी काम करूया. दोन्ही सरकारने एकत्र येऊन काम करूया याचा राज्याला फायदा होईल. तसेच महाराष्ट्राचा विकास होईल,” असेही ते म्हणाले.

“नागपूरकरांच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांची खूप गरज आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीतही विकासाची मेट्रो व्हावी. एकदा तरी मला या नागपूर मेट्रोतून प्रवास करायचा आहे,” असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.