AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका गाडीत बसलो नसलो, तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो : उद्धव ठाकरे

नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे त्याला मी कधी मागे पडू देणार नाही," असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले.

एका गाडीत बसलो नसलो, तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो : उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 28, 2020 | 1:43 PM
Share

नागपूर : बहुप्रतिक्षित लोकमान्यनगर ते बर्डी या अ‍ॅक्वामार्गावर मेट्रोच्या सेवेचे लोकापर्ण आज (28 जानेवारी) (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray)  करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून प्रकल्पाचे उद्धाटन केले. हे उद्धाटन झाल्यानंतर दुपारी 2 पासून प्रवासी फेऱ्या सुरु होणार आहेत. फक्त 20 मिनिटात 20 रुपयात नागपूरकरांना सीताबर्डी ते लोकमान्यनगर असा प्रवास करता येणार आहे.

या मेट्रोचे उद्धाटन करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी भाषण केले. यावेळी भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख माझे मित्र म्हणून केला. “आपण एका गाडीत बसलो नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आलो आहे. नागपूर मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना धन्यवाद,” असे नितीन गडकरींबाबत उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी कधी श्रेय घेतलं नाही, आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. आम्हाला फक्त लोकांचा आशिर्वाद पाहिजे. याचं श्रेय जनतेला जातं. नागपुरात सुरु असलेले प्रकल्प कधीच थांबवले जाणार नाही. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे त्याला मी कधी मागे पडू देणार नाही,” असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले.

या दरम्यान उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचेही आभार मानले. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस पूर्ण करण्याचा काम नितीन गडकरींनी केले. ते अत्यंत अभ्यासू माणूस असून ते भाषण सुद्धा अभ्यासपूर्वक करतात,” असेही ते म्हणाले.

“एखादं स्वप्न पाहण ते पूर्ण करणं यात फार फरक असतो. नुसती माहिती वाचून दाखवणं याला भाषण म्हणत नाहीत,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“आपण जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे माझी मेट्रो असं जे नाव दिले ते योग्य आहे. त्याचं मेट्रोचं लोकार्पण करत आहोत. मात्र प्रवास करताना त्याची स्वच्छता आणि निगा राखणं हे आपलं काम आहे. जर स्वच्छता आणि निगा राखली गेली तर माझ्या मुंबईची, नागपूरची आणि महाराष्ट्रातील मेट्रो बघण्यासाठी परदेशातून व्यक्ती येतील,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) केला.

“नागपूर विमानतळाची निविदा आहे. ती लवकरच मार्गी लावू. तसेच राज्यातील प्रकल्पांसाठी केंद्राने लवकर मंजुरी द्याव्या. मी आणि गडकरी आपण जर दोघं ही समन्वय साधून राज्यासाठी काम करूया. दोन्ही सरकारने एकत्र येऊन काम करूया याचा राज्याला फायदा होईल. तसेच महाराष्ट्राचा विकास होईल,” असेही ते म्हणाले.

“नागपूरकरांच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांची खूप गरज आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीतही विकासाची मेट्रो व्हावी. एकदा तरी मला या नागपूर मेट्रोतून प्रवास करायचा आहे,” असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...