AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं, आता दुजाभाव का? : मुख्यमंत्री

शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं, मात्र केंद्र सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्राला मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल, तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं, आता दुजाभाव का? : मुख्यमंत्री
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 18, 2020 | 12:19 PM
Share

सांगली : शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं, मात्र केंद्र सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्राला मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल, तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. देशाची अर्थव्यवस्था कोणामुळे कोमात गेली आहे, हे तपासून पाहण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray to Modi Government) दिला.

शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. शिवसेना सोबत होती म्हणून भाजपचे खासदार निवडून आले आहेत. केंद्र सरकार हे राज्याचे पालक असले पाहिजे. मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात म्हणाले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील अनेक विकास कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते उद्घाटनं झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच सांगली जिल्हा दौरा होता. त्याचवेळी संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘शिव प्रतिष्ठान’च्या संभाजी भिडे यांनी ‘सांगली बंद’ची हाक दिली होती. सांगली दौऱ्याला अपशकुन करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला.

‘आमचा संघ चांगलाच आहे. संघ म्हणजे टीम, जाऊद्या, नको तो वाद’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी रा. स्व. संघालाही टोला लगावला. ‘शेतकरी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सध्या शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. आता ती इच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘सहकार क्षेत्र मरु देणार नाही. मात्र शेतकऱ्यांचं हित हे सर्वात आधी पाहिलं पाहिजे, या मताचा मी आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत. मात्र त्यावर ज्यांचं कर्ज आहे त्यांनाही दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा : फडणवीसांच्या ‘हायपरलूप’ला अजित पवारांचा रेड सिग्नल

‘सध्याचं सरकार बदललं आहे. आमचं सरकार हे सूड उगवणारं सरकार नाही. आधीच्या सरकारने जे चांगलं केलं आहे ते सुरु ठेवणार. शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार काम करणार’ अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगलीचे सुपुत्र जयंत पाटील यांचंही कौतुक केलं. जयंत पाटील यांनी सांगलीत उत्तम काम केलं आहे. ‘जयंतराव, तुम्ही सगळे कार्यक्रमच करुन टाकले आहेत. मी जयंत पाटील यांचं भाषण मन लावून ऐकतो. जयंत पाटील बोलतात तेव्हा आपल्याला वाटतं की ते कौतुक करतात. आपल्याला गुदगुल्याही होतात. मात्र घरी गेल्यावर आणि नीट विचार केल्यावर समजतं की आपले ओरबाडे निघाले आहेत. चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. सगळ्यांसाठीच चांगलं काम करायचं आहे’ असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray to Modi Government) पुढे म्हणाले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या