AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून राजकारणासाठी देवाचाही वापर, सचिन सावंत यांचा घणाघात

भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं," अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली.

भाजपकडून राजकारणासाठी देवाचाही वापर, सचिन सावंत यांचा घणाघात
| Updated on: Nov 16, 2020 | 8:56 PM
Share

मुंबई : भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं,” अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली. ते मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (Congress leader Sachin Sawant alleged that BJP has used God for politics)

“भाजपने राजकारण करण्यासाठी देवालादेखील सोडले नाही. त्यांनी देवालाही राजकारणाच्या आखाड्यात ओढलं. भाजपच्या मनात देवाविषयी भक्तीभाव नाही. मात्र, राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करत राहीला आहे,” असं सावंत म्हणाले. तसेच, कोरोना संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे जनतेने आपली काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. राज्यातील सर्व मंदिरं सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिरं सुरु करता येतील अशी घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले. तर मुख्यमंत्र्यांना हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत.

प्रार्थनास्थळं सुरु करण्याची भाजपची मागणी

राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत करण्यात येत आहेत. मात्र, राज्यातील मंदिरं अद्याप बंदच होती. याच मुद्द्यावरुन मागील काही दिवसांपासून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यात बार आणि रेस्टॉरंट सुरू होतात, मग मंदिरं उघडण्याचा निर्णय का नाही, असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात होता.

राज्याला उशिराने सुचलेलं शहाणपण : प्रवीण दरेकर

राज्य सरकारचा मंदिरं सुरु करण्याचा निर्णय म्हणजे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला चिमटा काढला होता. “उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचलं, या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळेल. गरीब माणूस पांडुरंग किंवा परमेश्वराचरणी समाधान आणि शांती शोधत असतो. शिवाय जे व्यवसाय यावर अवलंबून असतात, त्यांचीही उपासमार होणार नाही, अशी आमची मागणी होती,” असं प्रवीण दरेकर म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

ही ‘श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट!

(Congress leader Sachin Sawant alleged that BJP has used God for politics)

Follow Us
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.