AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू-काश्मीरमधून ‘कलम 370’ हटवणार नाही, काँग्रेसची ग्वाही

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ‘जनआवाज’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात काँग्रेसने देशातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे, तसेच सत्तेत आल्यास विविध समस्यांवर काँग्रेस पक्ष काय करेल, याबाबत विस्तृत सांगण्यात आले आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यातून जम्मू-काश्मीरबाबत भूमिका मांडत, तेथील विकासासंदर्भात मांडणी केली आहे. “जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे, असे काँग्रेस मानते. जम्मू-काश्मीरचा […]

जम्मू-काश्मीरमधून 'कलम 370' हटवणार नाही, काँग्रेसची ग्वाही
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ‘जनआवाज’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात काँग्रेसने देशातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे, तसेच सत्तेत आल्यास विविध समस्यांवर काँग्रेस पक्ष काय करेल, याबाबत विस्तृत सांगण्यात आले आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यातून जम्मू-काश्मीरबाबत भूमिका मांडत, तेथील विकासासंदर्भात मांडणी केली आहे.

“जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे, असे काँग्रेस मानते. जम्मू-काश्मीरचा इतिहास आणि तेथील परिस्थिती यांचा काँग्रेस आदर करते. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरने भारतात येण्यास स्वीकारलं, या घटनात्मक स्थितीला बदलण्याची आम्ही परवानगी देणार नाही किंवा तसा कोणताही प्रयत्न करणार नाही.” अशी ग्वाही काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा, राहुल गांधी यांच्या 5 मोठ्या घोषणा

याचसोबत काँग्रेसने जम्मू-काश्मीरसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. “जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या आशा-अपेक्षांना समजण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग आहे. आम्ही हाच मार्ग अवलंबू”, असेही आश्वासन काँग्रेसने दिले आहे.

सीमेवरुन होणार घुसखोरी पूर्णपणे संपवण्याच्या आश्वासनासह काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटलंय की, “घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर अधिक सैनिक तैनात करणे, काश्मीर कोऱ्यात सैनिक आणि सीआरपीएफच्या हजेरी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांकडे अधिक जबाबदारी सोपवू.”

देशद्रोहाचा कायदा रद्द करणार : राहुल

कुठल्याही अटीविना काँग्रेस जम्मू-काश्मीरमधील जनतेशी संवाद साधेल, चर्चा करेल. यासाठी नागरिकांमधून तीन जणांची नियुक्ती करु, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका तातडीने घेतल्या जातील, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील जनतेला देशातील इतर भागात त्रास सहन करावा लागतो, गेल्या काही दिवसांतील घटनांमध्ये काँग्रेसला चिंता वाटते. त्यामुळे काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भातही काँग्रेस योग्य ती पावलं उचलेल, असेही आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्यातून दिले आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नेमकं काय म्हटलंय, पाहा जसेच्या तसे :

Follow Us
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.