AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EC Decision on NCP | राष्ट्रवादी संबंधी आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ञ उल्हास बापट यांची पहिली प्रतिक्रिया काय?

EC Decision on NCP | शरद पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, हे देखील तितकच स्पष्ट आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जो निकाल दिला, त्यावर आता घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया आली आहे.

EC Decision on NCP | राष्ट्रवादी संबंधी आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ञ उल्हास बापट यांची पहिली प्रतिक्रिया काय?
| Updated on: Feb 07, 2024 | 11:34 AM
Share

पुणे (योगेश बोरसे) | केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? या बद्दल निर्णय दिला. निवडणूक आयोग शिवसेनेपेक्षा वेगळा निकाल देणार का? या बद्दल उत्सुक्ता होती. कारण शरद पवार अजूनही राजकारणात सक्रीय आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच संविधान शिवसेनेपेक्षा वेगळं आहे, त्यामुळे निकाल दुसरा लागणार का? याकडे जाणकराच लक्ष लागलं होतं. पण निवडणूक आयोगाने बहुमत कोणाच्या बाजूने? हे पाहून निकाल दिला. सहाजिकच या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, हे देखील तितकच स्पष्ट आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जो निकाल दिला, त्यावर आता घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया आली आहे.

“कालच्या निकालामुळे लोकशाहीची अधःपतन झालं आहे. शिवाय घटनेची पायमल्ली झाली आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द झाला पाहिजे. शिवाय कोर्टाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे. ज्याच्याकडे बहुमत त्याच्या बाजूने निकाल देणे चुकीचे आहे” असं उल्हास बापट म्हणाले. “कालच्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांवर परिणाम होणार नाही, मात्र ते काय निकाल देतील ते आपल्याला माहिती आहे” असं उल्हास बापट म्हणाले.

विधानसभेतही तेच घडणार?

निवडणूक आयोगाने आधी शिवसेनेच्या बाबतीत निकाल दिला. एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने वैध मानलं. याच गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यानंतर विधानसभेत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा विषय होता, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतला. उदहारणार्थ पक्षाची घटना. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा विधानसभा अध्यक्ष याच गोष्टी पाहतील, अशी दाट शक्यता आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.