AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायतीचा गुलाल कोण उधळणार?, मतमोजणीला सुरुवात

रविवारी राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान झाले होते. त्यांचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायतीचा गुलाल कोण उधळणार?, मतमोजणीला सुरुवात
| Updated on: Oct 17, 2022 | 12:27 PM
Share

मुंबई :  महत्त्वाची बातमी आहे. रविवारी राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) मतदान झाले होते. त्यांचा आज निकाल (Results) लागणार आहे. आज कोण बाजी मारणार? भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट की काँग्रेस याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी 96 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या युतीला मिळाल्या आहेत. एकूण 96 बिनविरोध ग्रामपंचायतींपैकी 34 ग्रामपंचायती या भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याला आल्या. तर एकूण 15 ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाने बाजी मारली आहे. काँग्रेस 8, राष्ट्रवादी 17 आणि इतर 22 असं सध्याचं चित्र आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

मतमोजणीला सुरुवात

आज राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या  निवडणुकींचा निकाल लागणार आहे. रविवारी ग्रामपंचायत निवडणुकींसाठी मतदान झालं होतं. आज सकाळी दहा वाजल्यापासून मत मोजणीला सुरुवात झाली आहे. मत मोजणी केंद्रांबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्या आला आहे. ग्रामपंचायतीचा गुलाल कोण उधळणार? याची उत्सुकता निर्माण झाली असून, आता अवघ्या काही तासांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील एकूण 96 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

नाशिक जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. त्यापैकी सुरगाणाच्या उंबर पाडा दिंगरमध्ये स्थानिक विकास आघाडीचे चिमण पवार यांनी बाजी मारली आहे. तर नाशिकच्या वेळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे.  दरम्यान जवळपास सर्व पक्षांकडून आम्हीच निकालात बाजी मारणार असा दावा केला जात आहे. येत्या काही तासांत चित्र स्पष्ट होणार आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश