AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्र्यांवर घसरायचं? दीपक केसरकर कुणावर संतापले?

प्रत्येक वाक्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात असतील तर हे योग्य की अयोग्य याचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा, असं स्पष्ट मत केसरकरांनी व्यक्त केलं.

कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्र्यांवर घसरायचं? दीपक केसरकर कुणावर संतापले?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 01, 2022 | 3:43 PM
Share

पुणेः कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घसरायचं, हे योग्य नाही, अशी संतप्त टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. पुण्यातील शिरूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवनेरीवर येऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता.

छत्रपतींचा वारंवार होणार अवमान आम्ही सहन करणार नाहीत, असंही ते म्हणाले होते. मात्र दीपक केसरकर यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपतींबद्दल काहीच वादग्रस्त बोलले नाहीत, असं केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी तसेच इतरही लहान-मोठ्या पक्षांशी हातमिळवणी केली आहे. त्यावरून दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

ते म्हणाले, एवढे दिवस बाळासाहेबांच्या विचारांवर चालले नाहीत आणि आता त्यांना अनेक विचारांची गरज भासत आहे.

राज्यभर दौरे करणाऱ्या आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा दीपक केसरकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, अडीच वर्ष भेट मिळत नव्हती आता खोके खोके करत राज्यभर फिरत असतात काही गोष्टी ठरवून करण्यात आदित्य ठाकरेच आघाडीवर आहेत..

मागच्या अडीच वर्षात राज्यातल्या समस्यांवर मिटिंग लावू शकले नाहीत. त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचाही आधिकार नाही. फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या मात्र कृतीतून वेगळंच करायचं अशा शब्दात केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. राज्यपालांकडून छत्रपतींबद्दल विधान निघाले असेल… मात्र राज्यपाल हे भाजपाचे नेते नाहीत, तर ते घटनात्मक पदाचे प्रमुख आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे छत्रपतींचा अपमान महाराष्ट्रात सहन करणार नसल्याचे दिपक केसरकरांनी स्पष्ट केले.

छत्रपतींच्या घराण्याचा आदरच आहे. त्यांच्यापुढे नतमस्तकही झालोय. पण छत्रपतींबद्दल बोलत असताना, प्रत्येक वाक्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात असतील तर हे योग्य की अयोग्य याचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा, असं स्पष्ट मत केसरकरांनी व्यक्त केलं.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.