Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आप गेली, भाजप आली… नेमकं काय घडलं? 13 पॉइंटमध्ये समजून घ्या दिल्लीच्या सत्तेचं ‘राज’कारण!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा 70 पैकी 48 जागांवर विजय झाला आहे, तर आम आदमी पक्षाने 22 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा अपयश आले आहे. आपचा हा दारूण पराभव अनेक कारणांमुळे झाला असून, त्यात काँग्रेसचा भूमिका, एमआयएमचा प्रभाव आणि आपच्या काही मोठ्या नेत्यांचा पराभव समाविष्ट आहे.

आप गेली, भाजप आली... नेमकं काय घडलं? 13 पॉइंटमध्ये समजून घ्या दिल्लीच्या सत्तेचं 'राज'कारण!
narendra modi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2025 | 12:09 AM

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. विधानसभेच्या 70 जागांपैकी 48 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर 22 जागांवर आम आदमी पार्टीचा विजय झाला आहे. या निकालानंतर तब्बल 12 वर्षाची आपची सत्ता गेली आहे. तर 27 वर्षानंतर भाजपचं दिल्लीत कमबॅक झालं आहे. काँग्रेसला या निवडणुकीतही खातं उघडता आलं नाही. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि आपचा चेहरा असलेले अरविंद केजरीवालच पराभूत झाले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. तर मुख्यमंत्री आतिशी यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. यावरून आपची दिल्लीतील अवस्था काय झाली याची कल्पना येते. पण दिल्लीत आपचा इतका दारूण पराभव कसा झाला? यामागची कारणं काय आहेत? यावर टाकलेला हा प्रकाश.

निकाल कसे होते…

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 तारखेला मतदान झालं. आणि 8 फेब्रुवारी रोजी निकाल आला. यातील 48 जागांवर भाजप तर 22 जागांवर आपचा विजय झाला. आपने 2015मध्ये 67 आणि 2020मध्ये 62 जागांवर विजय मिळवला होता. म्हणजे आपला या निवडणुकीत 40 जागा गमवाव्या लागल्या आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत तिसऱ्यांदा खातंही उघडता आलं नाही. पण काँग्रेसने या निवडणुकीत आपच्या 13 जागा पाडल्याचं दिसतंय.

कुणाला किती मते मिळाली?

दिल्लीची सत्ता काबीज करणाऱ्या भाजपला 45.61 टक्के मते मिळाली. तर सलग दुसऱ्यांदा सत्तेत असलेल्या आपला 43.55 टक्के मते मिळाली. व्होट शेअरकडे लक्ष टाकले तर पाच मोठ्या पक्षांपैकी बीजेपी (45.56%), आप (43.57%), काँग्रेस (6.35%), जेडीयू (1.05%) आणि एआयएमआयएम (0.77%) ला मते मिळाली आहेत.

कुणाला फायदा? कुणाला नुकसान?

2015च्या विधानसभा निवडणुकीत आपला 54.5 टक्के तर 2020च्या निवडणुकीत आपला 53.8 टक्के मते मिळाली होती. म्हणजे या निवडणुकीत आपने फक्त सीटच गमावल्या नाहीत तर त्यांच्या व्होट शेअरलाही मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे भाजपला 2020च्या विधानसभा निवडणुकीत 38.51 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला यावेळी दिलासा मिळाला आहे. काँग्रेसला एकही जागा मिळाली नसेल पण त्यांच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. 2020च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 4.26 टक्के मते होती. 2025च्या निवडणुकीत हा आकडा वाढून 6.35 टक्के झाला आहे.

कुणाला किती जागांचा फायदा? किती नुकसान?

2020च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत आपला थेट 40 जागांचं नुकसान झालं आहे. आपला 2020च्या निवडणुकीत 62 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना फक्त 22 जागा मिळाल्या आहेत. तर 2020च्या निवडणुकीत फक्त 8 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 48 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे भाजपच्या 40 जागा वाढल्या आहेत. म्हणजे आम आदमी पार्टी जेवढ्या जागांवर पराभूत झाली, त्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत.

मोठे नेते, मोठा पराभव

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अनेक मोठे चेहरे आपला मतदारसंघ राखू शकले नाहीत. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बडे नेते पडण्याच्या या यादीत फक्त आपचे नेते नाहीत तर भाजपचेही नेते आहेत. आपचे नेते, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले. तर मतदारसंघ बदलूनही उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पराभूत झाले. आपचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाजही पराभूत झाले आहेत. माजी कायदेमंत्री सोमनाथ भारती आणि राखी बिडलान यांनाही पराभव पाहावा लागला आहे. भाजपमध्ये पक्षाचे दिग्गज नेते रमेश बिधुडी यांचा पराभव झाला आहे. त्यांना एम आतिशी यांनी पराभूत केलं.

या नेत्यांचा विजय

2025ची विधानसभेची निवडणूक आपसाठी लाभदायक ठरली नाही. पक्षाचे अनेक बडे नेते पराभूत झाले. तर काही बडे नेते मात्र विजयी झाले आहेत. यात आतिशी यांनी कालकाजी येथून विजय मिळवला आहे. गोपाल राय यांनी बाबरापूर येथून बाजी मारली आहे. टिळक नगर मतदारसंघातून जरनैल सिंग, ओखलामधून अमानतुल्ला खाना आणि बल्लीमारानमधून इमरान हुसैन यांचा विजय झाला आहे. भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांकडे पाहिले तर प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला. कपिल मिश्रा यांनी करावल नगर मतदारसंघातून आपच्या मनोज त्यागींचा पराभव केला. त्याशिवाय अरविंदर सिंग लवली, विजेंद्र गुप्ता, मनजिंदर सिंह सिरसा यांचा विजय झाला आहे.

नेमकं काय घडलं?

या निवडणुकीत आपचं मोठं नुकसान झालं. त्याला काँग्रेसही जबाबदार असल्याचं सांगितलं जातं. दिल्लीतील कमीत कमी 13 जागा अशा आहेत की तिथे काँग्रेसने आमच्या उमेदवारांना पाडलं. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव झाला. तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या काँग्रेस्चया संदीप दीक्षित यांनी 4568 मते मिळाली. जर दिल्लीत आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर केजरीवाल विजयी झाले असते. जंगपुरामध्ये मनीष सिसोदिया 675 मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात काँग्रेसच्या फरहद सुरी यांनी 7350 मते मिळवली. ग्रेटर कैलाशमध्ये सौरभ भारद्वाज हे 3188 मतांनी पराभूत झाले. या ठिकाणी काँग्रेसचे गर्वित सिंघवी यांनी 6711 मते घेतली. मालवीय नगरमध्ये सोमनाथ भारती 2131 मतांनी पराभूत झाले. या ठिकाणी काँग्रेसच्या जितेंद्र कोचर यांनी 6770 मते घेतली.

राजेंद्र नगरमध्ये आपचे दुर्गेश पाठक 1231 मतांनी पराभूत झाले. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला 4015 मते मिळाली. संगम विहारमध्ये आपचे उमेदवार दिनेश मोहनिया फक्त 344 मतांनी पराभूत झाले. या ठिकाणी काँग्रेसच्या हर्ष चौधरींना 15863 मते मिळाली. तिमारपूरमध्ये आपच्या सुरेंद्र पाल यांना 1168 मतांनी पराभूत व्हावं लागंल, या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला 8361 मते मिळाली. महरौलीमध्ये आपच्या महेंद्र चौधरींचा 1782 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला 9731 मते मिळाली. तिकडे त्रिलोकपुरीमध्ये आपच्या अंजना या फक्त 392 मतांनी पराभूत झाल्या. या ठिकाणी काँग्रेसच्या अमरदीप यांना 6147 मते मिळाली. या सर्व जागांवर काँग्रेसची आपला साथ मिळाली असती तर आज दिल्लीचा निकाल काही वेगळाच असता.

AIMIM चा भाजपला फायदा

फक्त काँग्रेसच नव्हे तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएनेही भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एमआयएममुळे दिल्लीच्या मुस्लिम बहुल मुस्तफाबाद मतदारसंघात भाजपचा विजय झाला. या ठिकाणी भाजपच्या मोहन सिंग बिष्ट यांनी 17578 मतांनी विजय मिळवला. मोहन सिंग यांना 85215 मते मिळाली, तर आपच्या अदील अहमद खान यांना 67637 मते मिळाली आहेत. एमआयएमच्या मोहम्मद ताहीर हुसैन यांनी अदिल यांचा खेळ खतम केला. त्यांनी मुस्लिम मते खाल्ली. हुसैन यांना 33434 मते मिळाली. त्यामुळे अदिल यांना पराभूत व्हावं लागलं.

या जागांवर विजयाचं अंतर मोठं

दिल्लीत काही जागांमध्ये विजयाचं अंतर खूप मोठं होतं. मटिया महल विधानसभा मतदारसंघात आपच्या आले मोहम्मद इकबाल यांचा विजय झाला. आले मोहम्मद यांना 58120 मते मिळाली. आणि त्यांनी 42724 मतांनी विजय मिळवला. दुसऱ्या नंबरवर राहिलेल्या भाजपच्या दिप्ती इंदौरा यांना 15396 मते मिळाली.

दुसऱ्या सर्वात मोठ्या विजयाचं सांगायचं झालं तर आपच्या चौधरी जुबैर अहमद यांनी सीलमपूर मतदारसंघातून 42477 मतांनी विजय मिळवला. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या अनिल कुमार शर्मा (गौड) यांना 36532 मते मिळाली.

या जागांवर विजयाचं अंतर कमी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काही जागांवर विजयाचं अंतर अत्यंत कमी होतं. संगम विहार मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंदन कुमार चौधरी फक्त 344 मतांनी विजयी झाले. त्रिलोकपुरी विधानसभा मतादरसंघात भाजपचे के रविकांत फक्त 392 मतांनी विजयी झाले. त्याशिवाय जंगपुरा विधानसभा मतदारसंघात तरविंदर सिंग मारवाह हे फक्त 675 मतांनी विजयी झाले. त्यांनी आपच्या मनीष सिसोदियांना पराभूत केलं.

या ठिकाणी भाजप मजबूत

मटियाला विधानसभा मतदारसंघात भाजपला सर्वाधिक मते मिळाली. या ठिकाणी भाजपचे संदीप सहरावत यांना 146295 मते मिळाली. त्यांनी 28723 मताधिक्यांनी विजय मिळवला. बवाना विधानसभा मतदारसंघातही भाजपला मोठ्या फरकाने विजय मिळाला. या ठिकाणी भाजपच्या रविंदर इंद्राज सिंग यांना 119515 मते मिळाली. त्यांनी 31475 मताधिक्यांनी विजय मिळवला.

मुस्लिम मतदारसंघात काय?

दिल्लीतील मुस्लिमबहुल मतदारसंघाकडे पाहिलं तर सीलमपूर, ओखला, मटिया महल, मुस्तफाबाद आणि बल्लीमारान मतदारसंघ हे महत्त्वाचे आहेत. सीलमपूरमध्ये आपचे जुबैर अहमद, ओखलामध्ये आपचे अमानतुल्लाह खान, मटिया महलमध्ये आपचे आले मोहब्बत इकबाल आणि बल्लीमारानमध्ये आपचे इमरान हुसैन यांनी विजय मिळवला आहे. तर मुस्तफाबाद विधानसभा सीटचा निकाल आश्चर्यकारक राहिला आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघ असूनही या ठिकाणी भाजपच्या मोहन सिंग बिष्ट यांनी मोठा विजय मिळवला आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.