AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis | संजय राऊत यांना विचारतो कोण? त्यांचा वजूद काय? देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा डिवचलं

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्याला पोलिसांची मदत होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Devendra Fadanvis | संजय राऊत यांना विचारतो कोण? त्यांचा वजूद काय? देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा डिवचलं
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 5:29 PM
Share

मुंबईः संजय राऊत यांना कोण विचारतो, त्यांना ना शिवसेनेत किंमत आहे ना शिवसेनेबाहेर. त्यांचा वजूद काय आहे? राऊत (Sanjay Raut) उद्या अमेरिकेच्या पंतप्रधान यांना घाबरत नाही असं म्हणतील. पण अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना हुंगतो का? असा खोचक सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa) आग्रह धरणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अखेर माघार घेतली. त्यानंतर शिवसैनिकांसमोर राणा दाम्पत्यानं हार मानल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांकडून दिली जात आहे. भाजप काही भंपक लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला करत होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी राऊतांवर खोचक टीका केली.

राणांना राष्ट्रीय नेता बनवण्याचा विडा उचललाय का?

राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा म्हणण्यावर शिवसेनेने एवढा गोंधळ माजवण्याचं कारणच नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते म्हणाले, ‘ हनुमान चालीसा म्हणतोय त्यावर येवढा राडा कशाला ? कुणाच्याही घरावर आंदोलन करायला आमचा विरोध आहे. पण कुणी हनुमान चालीसा म्हणतो म्हणून इतकी माणसं जमा करायची.. कुणी हल्ला करायला जाणार नव्हते.. रवी राणा आणि नवनीत राणा यांना राष्ट्रीय नेता बनवण्याचा बिडा शिवसेनेने उचलला का? ते गेले असते एखाद्या कोपऱ्यात हनुमान चालीसा पठन केला असता. कुणी दखलंही घेतली नसती. कुणाच्या घरावर जाणे, हल्ला करणे… शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतंय की सहानुभूती त्यांना मिळेल. त्यांना सहानुभूती मिळणार नाही.

‘कंबोज यांच्या हल्ल्याला पोलिसांची मदत’

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्याला पोलिसांची मदत होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, ‘ पोलिसांना हाताशी धरुन सगळं चाललंय. काल मोहित कंबोज यांच्यावर पोलीस मदत आहे म्हणून हल्ला झाला. मोहित कंबोज यांच्याकडे तलवार आहे, बंदूक घेऊन होते ॲसीड आहे असं म्हणनं हास्यास्पदच आहे. हल्ल्यानंतर त्यांच्यावर केसेस कशा टाकायच्या याची तयारी त्यांनी केली. पण यांच्या दुर्दवाने सीसीटीव्ही होते तिथे. सर्व सीसीटीव्हीकडे आमचं लक्ष आहे, की ते पुरावे बघून कारवाई करतात, की दबावाला बळी पडतात?

‘राष्ट्रवादीने गृहमंत्रालयाचे बारा वाजवले’

राष्ट्रवादी काँग्रेसने गृहमंत्रालयाचे बारा वाजवलेत अशी टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ गृहमंत्र्यांना चांगलं माहित आहे की राष्ट्रपती शासन कधी लागते.. सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेला सर्व माहित आहे. वळसे पाटील यांना कमीपणा वाटला पाहिजे की ते गृहमंत्री असताना गृह मंत्रालयाचे बारा वाजलेत. यांना काही सांभाळता आला नाही, आपलं अपयश झाकण्यासाठी हे भाजपचं नाव घेतात, एवढंच त्यांचं काम आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

इतर बातम्या-

Meghalaya: मेघालय सरकारच्या प्रवेश बंदी विधेयकाला राज्यपाल मलिकांचा ब्रेक; म्हणाले, यावर संमती राष्ट्रपतींची घेणार

अजय देवगणच्या उपस्थितीत मेटावर्समध्ये रनवे 34 गेम लाँच, आता डिजीटल कलेक्टेबलची खरेदी करता येणार

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.