AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“विरोधीपक्षात असतानाही फॉलोअप घेतला, पण…”, फडणवीसांनी टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं कारण सांगतलं…

राज्याबाहेर जाणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांसंदर्भात पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली....

विरोधीपक्षात असतानाही फॉलोअप घेतला, पण..., फडणवीसांनी टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं कारण सांगतलं...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 31, 2022 | 5:15 PM
Share

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढली आहे. राज्याबाहेर जाणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांसंदर्भात पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी टाटा एअरबस प्रकल्पाबाबत (Tata Airbus Project) सरकारची बाजू विस्ताराने मांडली. विरोधीपक्षात असतानाही फॉलोअप घेतला, पण तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केलं. उद्योगांना आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या नाहीत. त्यामुळे हे उद्योग राज्याबाहेर गेले, असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब म्हणून विकसित केलं जाईल, अशी केंद्रीय मंत्र्यांनी केलीय. त्यानुसार राज्यात प्रकल्प यायला सुरुवात झालीय. लवकरच राज्यात टेक्ससाईल पार्कदेखील येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, असं भासवलं जातंय. पण या प्रकल्पांसंदर्भात महाविकास आघाडी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेले, असं फडणवीस म्हणाले.

बच्चू कडू Vs रवी राणा वादावर भाष्य

बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना म्हटलं की आपल्याला सरकार बनवायचंय. आमची अशी इच्छा आहे की आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. या माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असं फडणवीसांनी सांगितलं.

माझ्या फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले. त्यामुळे बच्चू कडू यांनी कुणाशी सौदा केला, खोके घेतले, असं म्हणणं चुकीचं आहे. बाकी इतरांबाबत मी बोलत नाही. पण याचा अर्थ बाकीच्या लोकांनी सौदा केला, असं म्हणणं नाही. पण ते लोक माझ्या फोनवर गेलेले नाहीत. माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लावलेले आरोप चुकीचेच आहे, असं फडणवीस म्हणालेत.

Follow Us
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा.
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली....
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास...
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला.
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं.
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा....
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच....
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर.
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या.....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या....