AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाता जाता फडणवीस सिंचन घोटाळ्यावर बोलून गेले

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अवघ्या 79 तासांत राजीनामा (Devendra fadnavis on irrigation scam)  दिला.

जाता जाता फडणवीस सिंचन घोटाळ्यावर बोलून गेले
| Updated on: Nov 26, 2019 | 5:07 PM
Share

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अवघ्या 79 तासांत राजीनामा (Devendra fadnavis on irrigation scam)  दिला. बहुमत चाचणीतील पराभव टाळण्यासाठी राजीनामा देत आहे असे सांगत फडणवीसांनी राजीनामा दिला. याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (Devendra fadnavis on irrigation scam) होता. त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला. अधिकृत पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी याबाबतची अधिकृत घोषणा (Devendra fadnavis on irrigation scam) केली.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल सिंचन घोटाळ्यातील जवळपास 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीसांना सिंचन घोटाळ्याच्या चौकशीबाबत विचारले असता ते म्हणाले. “गेल्या 5 वर्षात आम्ही सिंचन घोटाळ्याची चौकशी केली. आता पुढील चौकशी कोर्ट करत आहेत.” असे ते (Devendra fadnavis on irrigation scam) म्हणाले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे सिंचन घोटळ्याची उघड चौकशी बंद करण्याचे आदेश काल देण्यात आले (Ajit pawar get relief irrigation scam) होते. सिंचन घोटाळ्यातील जवळपास 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्याचे आदेश दिले होते. यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र त्यानंतर सिंचन घोटाळ्यातील ज्या 9 प्रकरणांची चौकशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांचा अजित पवार यांच्याशी काहीही संबंध नाही. अशी माहिती महाराष्ट्र लाचलुचपत विभागाचे डीजी परमबीर सिंग यांनी दिली (Devendra fadnavis on irrigation scam) होती.

फडणवीसांकडून शिवसेनेवर टीकास्त्र

दरम्यान फडणवीसांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर अनेक ताशेरे ओढले. “शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले नसतानाही शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. मुख्यमंत्रिपद देणार नसाल, तर आम्ही कोणासोबतही जाऊ अशी धमकी त्यांनी दिली,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“आम्ही अनेक दिवस त्यांची वाट पाहिली. मात्र त्यांनी आमच्याशी चर्चा करण्याऐवजी ते कांग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करत होते. मातोश्रीमधून कधीही बाहेर न पडणारे लोक हॉटेलमध्ये जाऊन चर्चा करु लागले,” असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

फडणवीसांच्या तिन्ही पक्षांच्या सरकारला शुभेच्छा

यावेळी त्यांनी सत्तास्थापना करण्यासाठी अजित पवार आमच्याकडे पत्र घेऊन आले होते. म्हणून आम्ही सत्तास्थापना केली होती. असा दावाही फडणवीसांनी केली. मला विश्वास आहे की हे तिन्ही पक्ष चांगले सरकार चालवतील. त्यांना माझ्या शुभेच्छा. भाजप हटावचा अजेंडा घेऊन हे सगळे लोक सत्तेसाठी एकत्र आले (Devendra fadnavis on irrigation scam) आहेत.

भाजप विरोधी पक्षात बसणार

भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून त्यांना न्याय देण्याचे काम करु असेही फडणवीस यावेळी म्हणाले. दोन चाकाचे सरकार वेगाने धावते. पण तीन चाकाच्या सरकारची अवस्थाही वाईट होणार आहे. रिक्षा तीन चाके असतात. जर ती चाक तिन्ही वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागली तर तशीच अवस्था या सरकारची होईल असेही ते म्हणाले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक