AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरता का होईना विरोधकांची दखल घेतली याचा आनंद: फडणवीस

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही. विरोधकांसोबत केवळ एकच बैठक घेतली. | Devendra Fadnavis

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरता का होईना विरोधकांची दखल घेतली याचा आनंद: फडणवीस
| Updated on: Nov 25, 2020 | 3:56 PM
Share

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यापुरता का होईना, पण भाजपच्या आंदोलनाची दखल घेतली, याचा आनंद असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं पाठवली, सल्ले दिले. पण यापैकी एका पत्राचीही उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi govt)

ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे तक्रार केली असली तरी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडणे, हे आमचे काम आहे. सरकार मनमानी कारभार करणार असेल तर आम्ही शांत बसू शकत नाही. जनतेच्या आमच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यांची दु:ख आणि प्रश्न मांडणे, हे आमचे काम असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही. विरोधकांसोबत केवळ एकच बैठक घेतली. त्या बैठकीलाही आम्ही सर्व नेते उपस्थित होतो, तर उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर असल्याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते.

तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून कोरोनाच्या काळात राज्यात सुरु असलेल्या राजकारणाविषयी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असताना भाजपचे नेते आंदोलने करत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी एकदा या भाजप नेत्यांना समज द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

‘कुरघोडीच्या राजकारणात जनता भरडली जातेय, विधानपरिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटतील’

महाविकासआघाडीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे सामान्य जनता भरडली जात आहे. कोरोनाच्या काळात राज्य सरकारची निष्क्रियता दिसून आली. ग्रामीण भागात अतिवृष्टीनंतर जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. तर वीजबिलात सवलत देण्याच्या आश्वासनावरुनही सरकारने माघार घेतली. सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे हे घडत आहे. एक वर्षाच्या काळात सरकारने केवळ विकासकामांना स्थगिती दिली, ठोस असे काहीच केले नाही. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सरकारविरोधातील रोष दिसून येईल, असे फडणवीस यांनी म्हटले.

संंबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे प्रशासनासाठी जन्मले नाहीत; शंभर प्रश्न विचारले तर कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही: चंद्रकांतदादा

‘अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल’, सरनाईक प्रकरणावरुन जयंत पाटलांचं भाजपला प्रत्युत्तर

मुंबै बँक घोटाळ्याची चौकशी सुरु, सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांची माहिती; आम्ही चौकशीला घाबरत नाही, प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

(Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi govt)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.