AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्राम्हण समाजाबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य राजू शेट्टींना भोवले!

कोल्हापूर : ब्राम्हण समाजाविरोधात केलेलं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींना भोवलं आहे.  राजू शेट्टी यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथील प्रचारसभेत ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा विरोध ब्राम्हण समाजाकडून करण्यात आला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. निवडणूक […]

ब्राम्हण समाजाबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य राजू शेट्टींना भोवले!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

कोल्हापूर : ब्राम्हण समाजाविरोधात केलेलं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींना भोवलं आहे.  राजू शेट्टी यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथील प्रचारसभेत ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा विरोध ब्राम्हण समाजाकडून करण्यात आला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर राजू शेट्टी यांनी नोटीस पाठवण्यात आली होती. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेट्टींच्या विरोधात ब्राम्हण सभा आणि ब्राम्हण समाजाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. तसेच्या त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. अशा आशयाचे निवदेनही तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले होते.

राजू शेट्टींचं आक्षेपार्ह वक्तव्य

राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हातकणंगले येथील सभेत भाषण करताना म्हणाले, सीमेवर आमची पोरं जातात, कुणा देशपांडे, कुलकर्णींची पोरं जात नाहीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाजात संतापाची लाट उसळली होती.

सीमेवर सैनिक जातीसाठी नाही, तर देशासाठी लढतात याचा शेट्टींनी विसर पडला आहे. ते लोकप्रतिनिधी असताना जबाबदार व्यक्तीने सैनिकांची जात काढणे, जातीयवादी वक्तव्य करणे हे निंदनीय आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारे आहे, असं निवेदन ब्राम्हण समाजाकडून करण्यात आले होते.

राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. सध्या काँग्रेस- राष्ट्रावादीसोबत आघाडी करुन राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.