AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीत खरंच मोठा घोळ? निवडणूक आयोगाने सगळं सांगितलं; राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर!

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीविषयी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीत खरंच मोठा घोळ? निवडणूक आयोगाने सगळं सांगितलं; राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर!
rahul gandhi and election commission
| Updated on: Jun 07, 2025 | 4:31 PM
Share

Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एका दैनिकात थेट लेख लिहून या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवले आहे. ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने झालेली नाही. काहीतरी काळंबेरं आहे, असा मोठा दावा त्यांनी केलाय. त्यांच्या या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

निवडणूक आयोगाने नेमकं काय सांगितलं?

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली आहे. तसेच निवडणूक घेताना पूर्ण नियमांचे पालन करण्यात आले आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मदतारांची यादी, मतदानाची प्रक्रिया तसेच मतमोजणी ही लोकप्रतिनिधी कायदा 1950, निवडणूक नोंदणी नियम 1960 या कायद्यांच्या अधीन राहूनच करण्यात आली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

त्यावेळी कोणीही तक्रार केली नाही- निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरमम्यान मतदारांची संख्या अचानक वाढली. तसेच निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. हा दावादेखील निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. निवडणुकीसाठीचे उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या एजंट्सच्या उपस्थितीत मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे. काँग्रेस तसेच काँग्रेसच्या अधिकृत एजंट्सनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रिटर्निंग ऑफिसर तसेच निवडणूक निरक्षकांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नव्हती, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

राहुल गांधींनी थेट आकडेवारीच दिली

दरम्यान, राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा दावा करताना काही आकडेवारी सादर केली आहे. थेट आकडेवारीच सादर केल्यामुळे राहुल गांधीच्या आरोपांना वजन प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....