औरंगाबाद : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची सिल्लोडमधील सभा रद्द (rally) झाली आहे. आदित्य ठाकरे यांनीच ही सभा रद्द केली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याने कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्यासाठी ही मोठी चपराक असणार असल्याचं सांगितलं जात आहे.